पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचं अधिवेशन काल नवी दिल्लीतील एका स्टेडिअरवर पार पाडलं. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी नाट्यमय रंगल. अजित पवार यांच्या अगोदर जयंत पाटलांना भाषण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर अजित पवार अचानक पणे निघून गेल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला.
“सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते”
राष्ट्रवादीचे इतर नेत्यांची भाषणं सुरू असताना अजित पवारांच्या अगोदर जयंत पाटलांचं नाव भाषणासाठी पुकारण्यात आलं. जयंत पाटील भाषणासाठी उभे राहिले असता अजित पवार स्टेज सोडून बाहेर निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे अजित पवारांना आणण्यासाठी बाहेर गेल्या. त्या अजित पवारांना घेऊन येताच इकडे शरद पवाराचं अध्यक्षीय भाषण सुरू झालं. त्यानंतर अजित पवाराचं भाषण राहून गेलं. यानंतर राज्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“विरोधकांना कोंडीत पकडणारे तोंडावर चांगलेच आपटले”; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
अजित पवार यांना भाषण न झाल्याच्या प्रकरणावर जंयत पाटील म्हणाले की, अजित पवार माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. असं आहे की, कुणी लघूशंकेला गेलं तर त्याचीही बातमी करणं योग्य नाही. शरद पवारांच्या भाषणाला उपस्थित राहता यावं. म्हणून माझं भाषण सुरू असताना अजित पवार लघूशंकेला जाऊन आले अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.
पेडणेकरांचा भाजपच्या आरोपांच्या बॉलवर षटकार..! एका झटक्यात भाजपला केलं चारी मुंड्या चीत
दरम्यान, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूचा संसर्ग असल्यामुळे पक्षाचे अधिवेशन घेता आले नाही. महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध होते. आता कोरोनाचे सावट दुर झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खुले अधिवेशन आयोजित कऱण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षाला अशा प्रकारची अधिवेशने घ्यावीच लागतात असंही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापुर्वी केवळ शरद पवार यांच्याच अर्ज आला. मुळात पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. सगळ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी सर्वांची इच्छा मान्य केली. असंही अजित पवारांनी त्यानंतर सांगितलं.
Read also
- “भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”
- “शिवसेना अन् संभाजी ब्रिगेड युती पहिली निवडणुक सोलापूरातून लढणार”
- “काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर
- “फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारे
- “देवेंद्र फडणवीस खरे हिंदूचे नवे हिंदुह्दयसम्राट आहेत”; नितेश राणे