अहमदनगर : राज्यात मागील काही दिवसापासून लव्ह जिहाद, धर्मांतर आणि आदिवासी तरूणांच्या अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. त्याविरोधात आज भाजपने अहमदनगर येथे आंदोलन केले. या आंदोलनात भाजप नेते नितेश राणे यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलतांना त्यांनी फडणवीसांचा हिंदुह्यदयसम्राट म्हणून उल्लेख केला आहे. त्यावरून राज्यात आता एकच चर्चा रंगली आहे.
“पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल अन् याचे उत्तर देईल”; चित्रा वाघ यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल
राज्यात हिंदुत्ववादी सरकार आलं असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्ववादी आहेत. तर हिंदुह्यदयसम्राट देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. धर्मांतरण आणि आदिवासी तरूणांच्या अपहरणाच्या घटनाही वाढल्या आहेत. या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केला. अपहरण प्रकरणात पोलीस अधिकारी माहिती द्यायला तयार नाही. त्यांना बहुतेक या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री हे आता नवाब मलिक राहिलेले नाहीत. तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आता हसन मुश्रीफ नाहीत. याचा विसर पडलेला दिसतो. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“हजारो कोटींचा निधी बारामतीला ओरबडून घेतला, पण बाकी महाराष्ट्राचं काय ?”
राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे हिंदुद्वेषी होते. याच मविआ सरकारच्या काळात हिंदूंना दाबण्यात आले. धर्मांतरणाचे प्रकार वाढल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हिंदू धर्मांवर निर्बंध टाकण्यात आले. त्यांनी आता हिंदूत्वाची भाषा करू नये असही नितेश राणे म्हणाले.
Read also
- “सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते”
- “विरोधकांना कोंडीत पकडणारे तोंडावर चांगलेच आपटले”; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- पेडणेकरांचा भाजपच्या आरोपांच्या बॉलवर षटकार..! एका झटक्यात भाजपला केलं चारी मुंड्या चीत
- “सरकार, विरोधी पक्ष, याकडे राजकारणापलिकडे जाऊन बघा”; रोहित पवारांना चिंता
- “याकुब मेमनच्या भावाचा राज्यपालांसोबत फोटो”, काॅंग्रेसचा भाजपला सवाल