पुणे : देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याची एनसीआरबीने आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याचा मोठा हादरा महाराष्ट्राला बसला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. तसेच त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला यावर तातडीने उपाययोजना कऱण्याची मागणी केली आहे.
शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार ? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा
गेल्या वर्षात 10 हजार 881 शेतकरी, शेतमजूरांनी आत्महत्या केल्या आहेत. या आकडेवारीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याची माहिती एनसीआरबीची आकडेवारी हादरवणारी आहे. हे दृष्टचक्र वर्षानुवर्ष सुरू असून महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारं नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं ही वस्तूस्थिती असल्याचं रोहित पवार म्हणाले.
“गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले”, आता पार्सल कोथरूड ते कोल्हापुर जाणार
या विषयाकडे राजकारणापलिकडे जाऊन बघण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार, विरोधी पक्ष, तज्ज्ञ मंडळी माझी सरकारला विनंती आहे की, यावर तातडीने पुढाकार घ्यावा आणि विरोधी पक्षानेही सकारात्मक प्रतिसाद देत शेतकरी आत्महत्येचा राज्यावर लागलेल्या ड़ाग पुसून काढण्यासाठी मदत करावी. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Read also
- “याकुब मेमनच्या भावाचा राज्यपालांसोबत फोटो”, काॅंग्रेसचा भाजपला सवाल
- “पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल अन् याचे उत्तर देईल”; चित्रा वाघ यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल
- “हजारो कोटींचा निधी बारामतीला ओरबडून घेतला, पण बाकी महाराष्ट्राचं काय ?”
- “आमच्यामध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो”
- “ते दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले”; भाजपने ठाकरेंना पुन्हा डिवचलं