पुणे : भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे.तसेच बारातमीत जो विकास झाला आहे त्या मुद्यावरून राजकारण करायला हवे, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलं. त्यावर आता भाजपचे आमदार राम सातपुते यांनी रोहित पवारांना डिवचलं आहे.
“इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना अन् विरोधक खोके दाखवताहेत”; शाहाजी पाटील
युवराज बारामती हा महाराष्ट्र आणि देश मानून टींचा निधी ओरबडून फक्त बारामतीला घेऊन गेल्यावर थोडं तर फार दिसेलच ना ? पण बाकी महाराष्ट्राचं काय ? बारामती शहर हीच तुमची जहागिरी आणि तेच तुमचं विश्व आहे. असा घणाघाती टोला राम सातपुते यांनी रोहित पवारांवर लगावला.
आदित्य ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांनी लावला, मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला हात
आज बारामती पवार मुक्त करायची आहे. मुंबई ठाकरे मुक्त करायची या दोन विषयांवर भाजपचे राजकारण केंद्रीय आहे. मात्र सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपचे नेते बोलत नाहीत. बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत. कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
“चिप पल्बिसिटीबद्दल आपण कुप्रसिद्ध आहात हे विसरू नका”; नवनीत राणांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप बारामतीचा गड उध्वस्त करणार असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यात एकच चर्चा रंगली होती. यावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे.
Read also
- “आमच्यामध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो”
- “ते दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले”; भाजपने ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार ? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा
- “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले”, आता पार्सल कोथरूड ते कोल्हापुर जाणार
- “बारामतीने देशाला नाही पण पवार कुटुंबाला विकासाची दिशा दाखवली”