मुंबई : राज्यात दोन वर्षानंतर गणेश उत्सव दहीहंडी सारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. कोरोनामुळे काही निर्बंध असल्याने राज्यात मागील काही वर्षात सण साजरे करता आले नाहीत. मात्र यावर्षी सगळीकडे आनंदात साजरे केले जात आहेत. यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“चिप पल्बिसिटीबद्दल आपण कुप्रसिद्ध आहात हे विसरू नका”; नवनीत राणांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
राज्यात भाजप आणि शिंदे यांचं सरकार आल्यापासून जनतेला निर्बंधमुक्त सण साजरा करता येत आहेत. असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यातच गेले अडीच वर्ष सण साजरा करता आले नाहीत. ते दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले आहेत असं म्हणत मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मोहित कंबोज यांच्या टिकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की राज्यात निर्बंध लावल्यामुळेच आज आपण सण साजरा करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज्यातील हजारो जणांचे प्राण वाचले आहेत. अन्यथा इतर राज्यांसारखी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली असती. असं म्हणत मोहित कंबोज यांना आदित्य ठाकरेंनी फटकारलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे सध्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. त्यांनी गणेशोत्सवाच्या दरम्यान अनेक मंडळांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधला आहे.
श्री उद्धव ठाकरे @OfficeofUT जी ने इस साल 12 Crore महाराष्ट्र के लोगों को ना ही गणेशोत्सव की बधाई दी ना ही दही हांडी उत्सव की !
2.5 साल के बाद हिन्दुओं ने जो उत्साह से दोनो त्योहार मनाया हैं उसके लिए @mieknathshinde जी और @Dev_Fadnavis जी को दिल से धन्यवाद !
हर हर महादेव !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) September 10, 2022
Read also
- शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार ? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा
- “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले”, आता पार्सल कोथरूड ते कोल्हापुर जाणार
- “बारामतीने देशाला नाही पण पवार कुटुंबाला विकासाची दिशा दाखवली”
- “इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना अन् विरोधक खोके दाखवताहेत”; शाहाजी पाटील
- आदित्य ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांनी लावला, मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला हात