अमरावती : लव्ह जिहादच्या एका प्रकरणाबाबत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणाची चौकशी केली असता त्यांचा फोन रेकॉर्डिंग करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर नवनीत राणा यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांची हुज्जत घातली. मात्र या प्रकऱणात पीडित मुलगी स्वत: पळून गेल्याने याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांची खरडपट्टी काढली आहे.
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! साताऱ्यात युवासेनेचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश
लव्ह जिहादच्या नावाखाली 19 वर्षीय मुलीचा अमरावती येथील रूक्मिणी नगर परिसरातून अपहरण गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यानंतर पीडित मुलगी स्वत; पळून गेल्याने आणि तिच्यासोबत कुणी नसल्याचं पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितलं. त्यानंतर नवनीत राणांनी यांनी आयुक्त आरती सिंह यांना धमकावले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी हा पर्याय निवडला”; सुप्रिया सुळे
यावरून विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, खबरदार नवनीत राणा जर एस.पी. आरती सिंग सारख्या कर्तव्यदक्ष, हुशार व प्रामाणिक पोलिस महिला अधिकाऱ्यांवर आरोप करून धमकावलं तर. केसबद्दल काहीही माहिती न घेता लव जिहाद आरोप करून सामाजिक तेढ निर्माण करणे. पोलीस स्टेशन हे ड्रामाचे थिएटर नव्हे असं म्हणत त्यांनी नवनीत राणांना सुनावलं आहे.
“सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातांना बघून आशिष शेलार बावचळले”; किशोरी पेडणेकर
अमरावतीचे महापालिका आयुक्तांना काळ फासून अपमानित करणे, तेव्हाही एस.पी आरती सिंग यांची पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रार केली. आपण बोगस खासदार आहात हे विसरू नका, कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी पोलीस, आयुक्त, प्रशासनाला त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करून व्यत्यय आणणे हा सुद्धा गुन्हा आहे. खासदार, आमदार, मंत्री असलात तरी संविधानाने लोकप्रतिनिधींना अधिकार दिलेले आहेत. तसेच प्रशासनाचे आपले अधिकार असतात हे विसरू नका, चिप पल्बिसिटीबद्दल आपण कुप्रसिद्ध आहात हे विसरू नका असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- लव्ह जिहादच्या नावाने समाजात अशांतता पसरवण्याप्रकरणी राणांवर कारवाई करा ; काॅंग्रेसची फडणवीसांकडे मागणी
- “धर्म आणि अध्यात्म यामध्ये कोणीही राजकारण करू नये”; रोहित पवार
- “बारामतीत माझं काम बोलतं, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा..;”
- “थोडी लाज शिल्लक असेल तर जातीयवादी थयथयाटरागिणी पोलिसांची माफी माग”; रूपाली पाटलांचा राणांवर हल्लाबोल