मुंबई : ईडी वा अन्य केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून, ओरबाडून, लोकशाहीचा अवमान करून महाराष्ट्रातील सरकारचा सुरु असलेला कारभार अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य माणसांची सेवा करण्यासाठी जे लोक राजकारण व समाजकारणात आले आहेत त्यांना हा काळ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही तर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी हा पर्याय निवडला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
“मंत्रीपदासाठी शिंदे गटात सहभागी झालो नाही, मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; बंडखोर आमदार
पैसे, ईडी याद्वारे सत्ता ओरबाडून घेतली. सत्तेच्या माध्यमातून खरंतर सर्वसामान्यांची सेवा करण्याची अपेक्षा होती. मात्र मागच्या अडीच महिन्यात या सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्याचे दिसत नाही, असे ताशेरे त्यांनी राज्य सरकारवर ओढले. राज्यात अडीच महिन्यांपासून कोणत्याही जिल्ह्याला पाकलमंत्री मिळालेला नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी नवीन सरकारमधील मंत्र्यांकडे वेळ मागितला असता त्यांच्याकडून वेळ मिळत नाही, अशी खंत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
“शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार का ?” शालिनी ठाकरेंचा पेडणेकरांना सवाल
भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डाजी एका भाषणात म्हणाले होते की, एक देश एक पक्ष.. पण आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. संविधानावर माझा विश्वास असल्याने एक देश, अनेक पक्ष, असे माझे विचार आहेत. त्यामुळे मी भाजप नेत्यांचे मनापासून बारामतीत स्वागत करते, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. निर्मला सीतारमनजी यांचेही मी बारामतीत स्वागत करते. तेथे अनेक संस्था, शाळा खूप चांगले काम करतात, निर्मलाजींना वेळ असेल तर मी स्वतः त्यांना हे काम दाखवेन, असेही त्या म्हणाल्या.
“प्रत्येकाला बारामती मतदारसंघ हवासा वाटणे, यात काही गैर नाही”; सुप्रिया सुळे
आपल्या देशात लोकशाही ही खूप महत्त्वाची आहे, प्रत्येक पक्षाला त्याची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या आयटी, ईडी या केंद्रीय यंत्रणांचा वापर हा राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी होत आहे. हे एक नवीन नॉर्मल देशात सुरू झाले आहे. जे लोक आपला पक्ष सोडून भाजपमध्ये गेले त्यांची चौकशी थांबते, असे विधान भाजपचेच लोकप्रतिनिधी करतात. त्यामुळे वास्तव या देशाला दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी आहे. सर्वसामान्य माणसाला अडचणी येतात तेव्हा पदयात्रा करावी लागते. मी राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे स्वागत करते व त्यांना या पदयात्रेसाठी शुभेच्छा देते, असेही त्या म्हणाल्या.
Read also
- “सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातांना बघून आशिष शेलार बावचळले”; किशोरी पेडणेकर
- “माझी खुर्ची, माझा परिवार या पलिकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही”; शेलारांची टिका
- “शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? डरपोक गट” केदार दिघेंचा शिंदेंवर निशाणा
- “भाजपमध्ये विलीन व्हा, नाहीतर स्वत:चा पक्ष काढा, जनतेला त्रास का ?” रूपाली पाटील
- “राहुल गांधींची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी”; सुप्रिया सुळे