मुंबई : इंदिरा गांधींचाही पराभव झाला आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी देखील पराभूत झाले. स्वत: डॉ. आंबेडकरांचाही पराभव झाला होता. एवढी महान माणसं पराभूत झालेली आहेत. त्यामुळे निवडणुकीत कुणाचा विजय होणार हे कुणीही सांगू शकत नाही. तोच या निवडणुकांचा महिमा आहे. असं म्हणत बंडखोर आमदार शाहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला.
“बारामतीत माझं काम बोलतं, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा..;”
राजकारणात शरद पवार मोठेच नेते आहेत. वंसतदादा मुख्यमंत्री असताना बारामतीत शरद पवारांना निवडणुक जिंकणं अवघड गेलं होतं. तेव्हा शरद पवारांविरोधात शहाजी काकडे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना बनवत असताना प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार दिला आहे. या मतदारांनी या देशात फार चम्कार केले आहेत. असंही ते म्हणाले.
राजकारणात सहन करत हळूहळू जनतेची कामं करायची असतात. सेवा करायची असते. साधुसंतांनी आणि मोठमोठ्या नेत्यांनी आपल्याला हेच शिकवलं आहे. त्यामुळे खोक्याची कल्पना ज्यांनी आयुष्यभर खोकी सांभाळली त्यांच्या डोक्यातून आली आहे. इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना आणि विरोधक खोके दाखवत आहेत असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.
Read also
- आदित्य ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांनी लावला, मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला हात
- “चिप पल्बिसिटीबद्दल आपण कुप्रसिद्ध आहात हे विसरू नका”; नवनीत राणांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- लव्ह जिहादच्या नावाने समाजात अशांतता पसरवण्याप्रकरणी राणांवर कारवाई करा ; काॅंग्रेसची फडणवीसांकडे मागणी
- “धर्म आणि अध्यात्म यामध्ये कोणीही राजकारण करू नये”; रोहित पवार