पुणे : लव्ह जिहादच्या नावाखाली 19 वर्षीय मुलीचा अमरावती येथील रूक्मिणी नगर परिसरातून अपहरण गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यानंतर पीडित मुलगी स्वत; पळून गेल्याने आणि तिच्यासोबत कुणी नसल्याचं पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितलं. त्यानंतर नवनीत राणांनी यांनी आयुक्त आरती सिंह यांना धमकावले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. यावर आता काॅंग्रेसने एक ट्विट करत नवनीत राणांची हवाच काढून टाकली आहे.
“हजारो कोटींचा निधी बारामतीला ओरबडून घेतला, पण बाकी महाराष्ट्राचं काय ?”
या संपुर्ण प्रकरणानंतर पीडित मुलींनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. घरातूून माझ्या मर्जीने निघून गेली होती. तसेच याप्रकरणाचा आणि लव्ह जिहादचा काहीही संबंध नाही, फक्त माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया पीडित मुलींनी दिली आहे. त्यानंतर उताविळपणा, प्रकाश झोतात यायची हौस आणि सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते. नवनीत राणांनी जो काही धिंगाणा पोलीस कार्यालयात केला आणि त्या मुलीची हकनाक बदनामी केली. त्यासाठी नवनीत राणांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे, असं काॅंग्रेसने म्हटलं आहे.
“आमच्यामध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो”
यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटलांनी देखील नवनीत राणांवर कडाडून टिका केली आहे. पोलिसांच्या कुटुंबातील भगिनींने नवनीत राणांनी जो नाहक, कायदेशीर परिस्थिती न पाहता जो राडा घातला. त्यासाठी पोलिसांची माफी मागा मागणी केली आहे आणि ती योग्यच आहे. खासदारांनी सद्सदविवेक जागृत होऊन त्या लवकर माफी मागतील अशी आशा करू असं रूपाली पाटलांनी म्हटलं आहे.
“ते दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले”; भाजपने ठाकरेंना पुन्हा डिवचलं
यावरून विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, खबरदार नवनीत राणा जर एस.पी. आरती सिंग सारख्या कर्तव्यदक्ष, हुशार व प्रामाणिक पोलिस महिला अधिकाऱ्यांवर आरोप करून धमकावलं तर. केसबद्दल काहीही माहिती न घेता लव जिहाद आरोप करून सामाजिक तेढ निर्माण करणे. पोलीस स्टेशन हे ड्रामाचे थिएटर नव्हे असं म्हणत त्यांनी नवनीत राणांना सुनावलं आहे.
उताविळपणा, प्रकाश झोतात यायची हौस आणि सत्तेचा हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते.
नवनीत राणांनी जो काही धिंगाणा पोलीस कार्यालयात केला आणि त्या मुलीची हकनाक बदनामी केली त्यासाठी नवनीत राणांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे! pic.twitter.com/9ZVY4zsBeB— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 10, 2022
Read also
- “विरोधकांना कोंडीत पकडणारे तोंडावर चांगलेच आपटले”; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- पेडणेकरांचा भाजपच्या आरोपांच्या बॉलवर षटकार..! एका झटक्यात भाजपला केलं चारी मुंड्या चीत
- “सरकार, विरोधी पक्ष, याकडे राजकारणापलिकडे जाऊन बघा”; रोहित पवारांना चिंता
- “याकुब मेमनच्या भावाचा राज्यपालांसोबत फोटो”, काॅंग्रेसचा भाजपला सवाल
- “पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल अन् याचे उत्तर देईल”; चित्रा वाघ यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल