मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची अनेक शिवसेनेचे नेते साथ सोडत आहेत. मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरे यांना अनेक राजकीय संघटना पाठिंबा देत आहेत. यातच संभाजी ब्रिगेडने देखील शिवसेनेला आपला पाठिंबा जाहिर करून टाकला आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुका सोबत लढणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पेडणेकरांचा भाजपच्या आरोपांच्या बॉलवर षटकार..! एका झटक्यात भाजपला केलं चारी मुंड्या चीत
संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने युती देखील केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती पहिली निवडणुक सोलापूरातून लढणार असल्याचं युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाच्या निवडणुका शिवसेना युवासेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रितरित्या लढवणार आहेत. असं त्यांनी म्हटलं आहे.
“सरकार, विरोधी पक्ष, याकडे राजकारणापलिकडे जाऊन बघा”; रोहित पवारांना चिंता
शिवसेना आणि धनुष्यबाण याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणासाठी पाच न्यायाधीशांचं खंडपीठ देखील बसवण्यात आलं आहे. याची पुढची सुनावणी आता 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे याचा निकाल शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी फार महत्वाचा आहे.
Read also
- “काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर
- “फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारे
- “देवेंद्र फडणवीस खरे हिंदूचे नवे हिंदुह्दयसम्राट आहेत”; नितेश राणे
- “सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते”
- “विरोधकांना कोंडीत पकडणारे तोंडावर चांगलेच आपटले”; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल