मुंबई : उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असल्याचा दावा वरूण सरदेसाई यांनी केला. त्यांनी निर्धार यात्रेची सुरूवात तुळजा भवानीच्या दर्शनाने केली आहे. ते उस्मानाबाद येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यावरून आता त्यांच्यावर भाजपचे नेते निशाणा साधताना दिसत आहेत.
“काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर
उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाची दखल सगळ्यांनी घेतली. ते कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील त्यांनी दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. उद्या त्यांची लोकप्रियता अशीच वाढत राहिली तर 2014 ला ते पंतप्रधान पदाचे दावेदार बनू शकतील. या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केलं असा दावा सरदेसाई यांनी केला आहे.
“फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारे
वरूण सरदेसाई यांच्या या दाव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक टोला हाणला आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असल्याचा वरूण सरदेसाईंचा दावा खरा आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले, फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता, असा टोला भातखळकरांनी सेनेला लगावला.
“देवेंद्र फडणवीस खरे हिंदूचे नवे हिंदुह्दयसम्राट आहेत”; नितेश राणे
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली. त्यानंतर भाजप उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टिका करीत आहे. तसेच आगामी निवडणुका ह्या एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचं देखील भाजपने यापुर्वी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुढे काय राजकीय घडामोडी घडणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
- “आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू”; चंद्रशेखर बावनकुळे
- “अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते”; नाराजी नाट्यमयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”
- “शिवसेना अन् संभाजी ब्रिगेड युती पहिली निवडणुक सोलापूरातून लढणार”