पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापुर्वी केवळ शरद पवार यांच्याच अर्ज आला. मुळात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो. हे आपल्याला माहीत आहे. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असावेत अशी देशातील कार्यकर्ते, नते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. सगळ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी सर्वांची इच्छा मान्य केली. असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले.
“फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारे
राष्ट्रवादी काॅंग्रेसचं अधिवेशन काल नवी दिल्लीतील एका स्टेडिअरवर पार पाडलं. यावेळी एका मताने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या पु्न्हा एकदा नावाची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अनेक खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच याठिकाणी अनेक नेत्यांनी भाषणं केलीत.
“देवेंद्र फडणवीस खरे हिंदूचे नवे हिंदुह्दयसम्राट आहेत”; नितेश राणे
गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूचा संसर्ग असल्यामुळे पक्षाचे अधिवेशन घेता आले नाही. महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध होते. आता कोरोनाचे सावट दुर झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खुले अधिवेशन आयोजित कऱण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षाला अशा प्रकारची अधिवेशने घ्यावीच लागतात असंही अजित पवार म्हणाले.
“सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते”
दरम्यान, राष्ट्रवादीचे इतर नेत्यांची भाषणं सुरू असताना अजित पवारांच्या अगोदर जयंत पाटलांचं नाव भाषणासाठी पुकारण्यात आलं. जयंत पाटील भाषणासाठी उभे राहिले असता अजित पवार स्टेज सोडून बाहेर निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे अजित पवारांना आणण्यासाठी बाहेर गेल्या. त्या अजित पवारांना घेऊन येताच इकडे शरद पवाराचं अध्यक्षीय भाषण सुरू झालं. त्यानंतर अजित पवाराचं भाषण राहून गेलं. यानंतर राज्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या.
Read also
- “आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू”; चंद्रशेखर बावनकुळे
- “अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते”; नाराजी नाट्यमयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”
- “शिवसेना अन् संभाजी ब्रिगेड युती पहिली निवडणुक सोलापूरातून लढणार”
- “काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर