मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनसेने मशिदीवरील भोंग्याबाबात आंदोलन छेडलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांना तुरूंगात जावं लागलं. यामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर केस दाखल करून राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली होती. त्याचाच धागा पकडत संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“शिवसेना अन् संभाजी ब्रिगेड युती पहिली निवडणुक सोलापूरातून लढणार”
शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय. ते आता उगवतंय. तु्म्ही अडीच वर्षात लोकांवर खोट्या केसेस टाकल्या. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर आणि संतोष धुरीवर खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला म्हणून. ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? त्यांचं स्टेटमेंट नाही, काही नाही. गेल्य़ा अडीच वर्षात अनेक खोट्या केसेस तुम्ही लोकांवर टाकल्या. त्यामुळे जे पेरलंय. ते उगवतंय असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
“काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर
एकनाथ शिंदे यांच्या बडंखोरीनंतर शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला.
“फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारे
दरम्यान, अलिकडेच संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट वर्षा येथील शासकीय निवासस्थानी घेतली. त्यानंतर आगामी निवडणुकीत मनसे शिंदे गट एकत्र येणार का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.
Read also
- “उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने ‘शिवसेना’ फोडली”
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
- “आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू”; चंद्रशेखर बावनकुळे
- “अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते”; नाराजी नाट्यमयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”