मुंबई : उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असल्याचा दावा वरूण सरदेसाई यांनी केला. त्यांनी निर्धार यात्रेची सुरूवात तुळजा भवानीच्या दर्शनाने केली आहे. ते उस्मानाबाद येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यावरून आता त्यांच्यावर भाजपचे नेते निशाणा साधताना दिसत आहेत.
“उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने ‘शिवसेना’ फोडली”
उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाची दखल सगळ्यांनी घेतली. ते कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील त्यांनी दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. उद्या त्यांची लोकप्रियता अशीच वाढत राहिली तर 2014 ला ते पंतप्रधान पदाचे दावेदार बनू शकतील. या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केलं असा दावा सरदेसाई यांनी केला आहे.
“राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
वरूण सरदेसाई यांच्या या दाव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक टोला हाणला आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असल्याचा वरूण सरदेसाईंचा दावा खरा आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले, फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता, असा टोला भातखळकरांनी सेनेला लगावला.
“आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू”; चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली. त्यानंतर भाजप उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टिका करीत आहे. तसेच आगामी निवडणुका ह्या एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचं देखील भाजपने यापुर्वी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुढे काय राजकीय घडामोडी घडणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
‘उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली’, वरुण सरदेसाईंचा दावा.
Hmmmm खरंय, उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले…
फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता. pic.twitter.com/cdJhOc4iLJ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 10, 2022
Read also
- “जयंत पाटील, त्यानंतर शरद पवारांचं भाषण झालं, पण तुमचं भाषण नाही”, अजित पवार म्हणाले,.
- “तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा कांगावा कुणीतरी मोठ्या नेती ने केला होता”; चित्रा वाघ यांची सुळेंवर टिका
- “गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर..;” अन् अजित पवार संतापले
- “शरद पवार अन् अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे दानवसारखं बरळू नका”
- “शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय, ते आता उगवतंय”