मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देत एकनाथ शिंदे यांनी आता राष्ट्रवादी आणि शेकापला देखील धक्के दिले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे येथील शेकापचे नेते अर्जून डांगे यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी समर्थन दिले आहे.
“लाडू-पेढे पळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड”; मुख्यमंत्र्यांची सभा चर्चेत
गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गटात प्रवेश करण्याचा राजकीय नेत्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. अशातच पनवेल संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत राऊत आणि अर्जून डांगे या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थित आपला पाठिंबा शिंदे गटाला जाहीर केला आणि त्यात प्रवेश केला. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्तेही मोठ्या संख्य़ेने शिंदे गटात सामील झाले.
“भुमरेंच्या मागच्या सभेला केवळ 110 लोकं होती, यावेळी तो फ्लॉफ शो होऊ नये म्हणून कदाचित”
निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मत मागितले होते. लोकांनी भाजप सेनेला सत्तेत आणले. पण यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली. भारताचा शत्रु असलेल्या मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण यांच्याच काळात झाल्याची टिका या नेत्यांनी केली. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाकड़ून आता जोरदार मोर्चबांधणी सुरू आहे. गेल्याच महिन्यात पनवेलमध्ये शिंदे गटाकडून मनसेला खिंडार पाडण्यात आलं होतं. पनवेल, उरणमधील नाराज मनशिवसैनिकांनी मागच्या महिन्यात शिंदे गटात प्रवेश केला होता.
“काही दिवसांनी पटोलेंच भाजपमध्ये येतील पण आम्ही त्यांना घेणार नाहीत”
दरम्यान, पनवेलमध्ये शिंदे गटाकडून जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, यांच्यासह उरण तालुका उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, कामगार सेनामधील पदाधिकारी, उपशहर प्रमुखसह पुर्ण मनसे खारघर मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश झाला.
Read also
- “उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”
- “दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे
- “पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही”; रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य
- “मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा”; भास्करराव जाधव
- “मुख्यमंत्र्यांनी ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या आजाराकडे गंभीरतेने बघावं” अजित पवार