औरंगाबाद : समोर दिसणारी विराट गर्दी ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंवर प्रेम करणारी आहे. राज्यातील शिवसेना नेमकी कुठली, त्याचं उत्तर आजच्या विराट सभेनं दिलं आहे. राजकारणामध्ये दिलेला शब्द आम्ही पाळतो, म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला असं माझे सहकारी म्हणतात. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी मला एकच शिकवण दिली आहे. जे होणार असेल ते बोला आणि जे होणार नसेल ते बोलू नका, त्यामुळे दिलेला शब्द मी पाळतो आणि एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण येथे वक्तव्य केलं.
“काही दिवसांनी पटोलेंच भाजपमध्ये येतील पण आम्ही त्यांना घेणार नाहीत”
एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, राज्यातील मंत्री आमदार, खासदार उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की, एकदा संदीपान भुमरे माझ्याकडे आला आणि हा मोठा निर्णय घ्यायला लावला. त्यानंतर मला शंका होती की हे होईल की नाही. परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला. संदीपान भुमरे धाडसी निघाले. परंतु राज्यातील इतर नेत्यांना माझ्यासगट 50 लोक सगळ्यांना पुरून उरले असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
“फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता”
सत्तेतून पायउतार झालो आणि सगळ्यांच्या विरोधात गेलो. एकदा सरपंच तसेच ग्रामसेवक देखील एखादा निर्णय घेण्यासाठी अनेकदा विचार करतो. पंरतु आम्ही हा मोठा निर्णय घेतला. आम्ही घेतलेला कार्यक्रम पुर्ण कऱण्यासाठी अनेक लोकांनी प्रार्थना केली. असंं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही”; रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य
- “मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा”; भास्करराव जाधव
- “मुख्यमंत्र्यांनी ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या आजाराकडे गंभीरतेने बघावं” अजित पवार
- “लाडू-पेढे पळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड”; मुख्यमंत्र्यांची सभा चर्चेत
- “भुमरेंच्या मागच्या सभेला केवळ 110 लोकं होती, यावेळी तो फ्लॉफ शो होऊ नये म्हणून कदाचित”