नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून सत्ता मिळवण्यासाठी एनडीएसह इंडिया आघाडी चांगलीच कामाला लागली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील सगळेच नेते झपाटून कामाला लागले आहेत. तर विरोधी पक्षातील नेते देखील चांगलीच रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुक जिंकायचीच हे धोरण नजरेसमोर ठेऊन भाजपने पाच नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. तसेच अबकी बार ४०० पार चा नाराही भाजपने दिला आहे. तो पुर्ण करण्यासाठी भाजप चांगलचे प्रयत्न करतांना दिसत आहेत. त्यासाठी एक नेता हा महाराष्ट्राचा असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंची डोकेदुखी वाढली ; सोलापुर लोकसभेतून वंचित उमेदवार देणार ?
लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने आजपर्यंत सर्वेच प्रयत्न करतांना दिसत आहेत. यातच कोणत्याही परिस्थितीत लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याचे हत्यार उपसले आहेत.
आतापर्यंत भाजपचे हे लक्ष्य ८० टक्के पुर्ण झाले असून विरोधी पक्षाच्या एक लाख नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपात आणण्याचे काम सुरू आहे. यासाठी पाच नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामधील एक नेता हा महाराष्ट्रातला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्या नेत्याचं नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाहीय.
हेही वाचा…हिंगोलीतील उमेदवार बदलण्याच्या मागणीला जोर, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा कडाडून विरोध
लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की पार ४०० पार अशी घोषणा दिली आहे. मात्र लोकसभेची घोषणा होण्याआधीच भाजपने यासाठी मोठी व्युहरचना आखली आहे. निवडणुकीपुर्वीच विरोधी पक्षांची ताकद असलेल्या नेत्यांना भाजपात आणण्याची योजना भाजपने आखली आहे.आतापर्यंत विरोधी पक्षातील किमान एक लाख विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचे लक्ष्य भाजपने केंद्रीत केले आहे.
इतर पक्षातील नेत्यांना भगवाधारी बनविण्याचे भाजपचे हे लक्ष्य जवळपास पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत विरोधी पक्षांच्या जवळपास ८० हजार लहान मोठे नेते कार्यकर्त यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. एक लाख हे लक्ष्य पुर्ण करण्यासाठी पक्षाला आता फक्त २०००० ही संख्या गाठायची आहे.
READ ALSO :
हेही वाचा…५ वर्षामध्ये मतदारसंघांमध्ये का नव्हता? आता प्रचारासाठी वेळ कसा भेटला ? कोल्हेंविरोधात मतदारांची प्रंचड नाराजी
हेही वाचा…मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ
हेही वाचा…“एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक ठरणार”, तुम्ही इंडिया आघाडीला निवडा,” उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन
हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढत अटळ, कॉंग्रेस अन् भाजपमध्ये वंचित ठरणार गेम चेंजर ?
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय
महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० तोफा धडाडणार ! लोकसभेसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर