मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने आपल्या १७ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये काही विद्यमान खासदारांनी पुन्हा संधी दिली आहे. तर याठिकाणी ठाकरेंनी नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राज्यात प्रथमच राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात मोठी फुट पडल्यानंतर या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्षा लागून राहिलं आहे. यातच आता ठाकरे गटाने आपल्या ४० स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे.
हेही वाचा…“रोहित पवारांनी आता फक्त स्वत:ची आमदारकी सांभाळावी”, भाजपचा रोहित पवार उपरोधिक टोला
आगामी लोकसभा निवडणुकीकरीता उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या मोठ्या संपुर्ण महाराष्ट्रात होणार आहे. यासाठी आता ठाकरे गटाकडून महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० तोफा धडाडणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे, सुनील प्रभू, आदेश बांदेकर, अंबादास दानवे, वरूण सरदेसाई, रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, प्रियंका पाटील यांचाही समावेश आहे.
हेही वाचा…“कामगारांचा मुलगा अन् विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी”, लढाई जिंकणार कशी ? राम सातपुते यांनी सांगितली रणनिती
दरम्यान, महाराष्ट्रात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. सुरूवातीला विदर्भातील लोकसभा तर मुंबईत शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. याची मतमोजणी ही ४ जून रोजी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलयं.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंची डोकेदुखी वाढली ; सोलापुर लोकसभेतून वंचित उमेदवार देणार ?
हेही वाचा…हिंगोलीतील उमेदवार बदलण्याच्या मागणीला जोर, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा कडाडून विरोध
हेही वाचा…“आधी प्रचार करणार नाही म्हणाले, अन् आज थेट पेढे घेऊन दानवे खैरेंच्या घरी,” एकच चर्चा
हेही वाचा…“पवार घराण्याने नेहमी झोडा आणि तोडा भूमिका घेतलीय”, पण आता..,” यशवंत ब्रिगेडने बारामतीत दोन्ही पवारांना दिलं आव्हान
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय