बारामती : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामाना जवळपास निश्चित झाला आहे. परंतु या लढाईत आता अपक्ष म्हणून उतरणार, असे जाहीर विधान शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केलं आहे. त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होणार का ? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच यावेळी विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांना देखील मोठा विरोध केला आहे.
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या”, पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण
विजय शिवतारे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही आहे. याठिकाणी आजतागायत पवार विरूद्ध पवार असं चित्र दाखवलं जात आहे. पवारांच्या विरोधात पाच लाख ऐंशी हजार मतदान जवळपास आहे. आता जी लढाई दाखवली जात आहे. ती फक्त पाच ते सहा लाखांमध्ये दिसत आहे. पवारांना विरोध करणारे मोठ्या प्रमाणात या लोकसभा मतदारसंघात सध्या आहेत. मग त्यांनी मतदान नेमकं कुठे करायचं ? असा सवालही त्यांनी केलाय. यातच अजितपवारांना आपला अपमान केलाय. पाच ते सहा पक्ष एकत्रित करून कटकारस्थान केलं आहे. अशा पद्धतीने अजित पवार पुरंदरांच्या जनतेशी वागले आहेत. मग त्यांना आपण मतदान कसं करायचं ? असे अनेक प्रश्न लोक मला विचारत आहेत. सध्या अजित पवारांना मतदान करण्याच्या मानसिकेत अजूनही बरेच लोक नाही आहेत.
संसदेत भाषणं करून काहीही होत नाही हे अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी पंधरा वर्षात काहीच विकास केलेला नाही. कुठेही पाच दहा लाखांचीही कामे नाहीत. केंद्र सरकारचे मोठमोठे प्रकल्प वेगवेगळ्या भागात आणायला पाहिजे होते. परंतु त्यांनी फक्त बारामतीत काही कामे केलीत. मग तुम्ही काय बारामती शहाराचे खासदार आहेत का ?अशी विदारक परिस्थिती आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“900 एकरवर सभा, कोट्यवधी मराठे एकत्र येणार,” जरांगे पाटलांचा निवडणुकीपुर्वी सरकारला कडक इशारा
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. यातच अजित पवार सांगताहेत की शरद पवारांच्या जाचाला कंटाळून आम्ही महायुतीत आलो आहे. परंतु अजित पवारांना मतदान करण्याच्या मानसिकतेत जनता उभी नाही. असेही ते म्हणाले. दोन पवारांच्या विरोधात लढाई जरी असली तर या लढाई विजय शिवतारे उतरणार म्हणजे उतरणार असेही शिवतारे यांनी सांगितले आहे.
50 वर्ष ज्या प्रास्थिपत लोकांना आमचा छळ केला आहे. त्यांना निवडून देण्याची लोकांची मानसिकता नाही. त्यामुळे महायुतीत काय निर्णय होईल ते मला माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्याचा धाडस मी करणार. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मी अपक्ष निवडणुक लढणार, नरेंद्र मोदी विचारमंच उभा करणार असेही त्यांनी जाहीर केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पूर वाहिला, पण मंत्र्यांनी नाही पाहिला”
हेही वाचा“तु आता कोणत्याही बापाला समोर घेऊन आला तरी पराभव करू”, तानाजी सावंतांचा निंबाळकरांना इशारा
हेही वाचा…रविंद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..”गद्दारांचं नशीब आहे की आज…”
हेही वाचा…“अजित पवारांना मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात परतणार
हेही वाचा१ हजार ५० कोटींच्या विकासकामांचा ‘धम्माका’…,देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगे यांना दिले मोठं गिफ्ट