मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी मतदारांना एक पत्र लिहलं आहे. रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात विनायक राऊत यांनी सामंत आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत झालेल्या शिवसेना मेळाव्याच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली. त्यावरूनत आता उदय सामंत यांनी पत्रक जारी केलं आहे.
“प्रशासनाला विनाकारण ताण येईल, असं काहीही करू नका”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
याचबरोबर त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका ही केली आहे. यावेळी भाषणादरम्यान काहींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती निष्ठा व्यक्त केली. पण ती ‘काही मंडळी’ कोण होती? ज्यांनी विनायक राऊत यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीला नारायण राणे यांच्या आदेशाचे पालन केले…काहींनी तर प्रचाराची पत्रके गटारात फेकून दिली होती. त्यातील एकाने तर विनायक राऊत माझ्या अन्नावर जगतात नाहीतर त्यांना जेवण पण मिळू शकत नाही. असं या पत्रात त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आता गुजरात अन् गोवामध्ये देखील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात
माझा कोणावरच राग नाही पण दु:ख एकच आहे की, विनायक राऊत यांच्यासारखी एक अनुभवी व्यक्ती ज्या व्यक्तीला मी आपलं मानलं आणि आजही मानतो त्यांनी मला गद्दार, उपरा…अजून बरंच काही म्हणणं मला रुचले नाही, अशी खंत व्यक्त करत आम्ही उठाव केल्याचे कारणेही दिली आहेत. तसेच ही गद्दारी की धाडस हे आपण ठरवा, असं आवाहनही सामंत यांनी केलं आहे. गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो, ह्याचे साक्षीदार स्वत: राऊतसाहेब, अनिल देसाई हे आहेत आणि ज्यांच्या मध्यस्थीने मी करत होतो. त्यांचं नाव मी योग्यवेळी जाहीर करेन.
“आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रावादीचा मोठा निर्णय”; निवडणुकीत २७ टक्के ओबीसी आरक्षण देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उद्धव साहेबांचं जुळू नये यासाठी काम करणारी काही माणसं तिथं होती. हे विनायक राऊत यांनाही माहित आहे. तसं त्यांनी मला बोलूनदेखील दाखवलं आहे. घटक पक्षासोबतची अनैसर्गिक आघाडीसोबत राहण्यापेक्षा बाळासाहेब आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराने निर्माण झालेल्या युतीसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला तर माझं काय चुकलं, असा सवाल सामंत यांनी पत्रात केला आहे. यापुढे कुणीही कितीही टीका केली तरी माझी प्रतिक्रिया हीच असणार, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
Read also
- सदा सरवणकरांचा सेनेला जय महाराष्ट्र; फाटक, शहांची शिवसेनेतुन हकालपट्टी
- “द्रौपदी मूर्मूंना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला नाही”; राऊतांनी भाजपला डिवचलं
- “आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखा नेता”; विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी सेना, राष्ट्रवादीमध्ये चुरस
- “तुमच्याकडे फक्त सहा महिन्याचं आयुष्य, शरद पवारांनी पैज लावली अन् ती जिंकलीही”
- “माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु मला तुमची ताकद हवीय”