पुणे : अहमगनगरचे नामांतर करून अहिल्यानगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावरून राज्य सरकारने अहमदनगर पालिकेला ठराव करून पाठवण्याचे निर्देश दिले आहे. त्यावरून अहमदनगर शहराचे नामांतर व्हावे यासाठी हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून आता पडळकरांना आरपीआयच्या सचिन खरात यांनी आव्हान दिलं आहे.
शिंदे गटाचे फायर ब्रॅंड आमदार शहाजी बापूंनी घटवलं 8 किलो वजन, कारण आलं समोर
सचिन खरात म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर जिल्हा करा अशी मागणी केली. गोपीचंद पडळकर आपण ज्या धनगर समाजातून येत आहात. त्या धनगर समाजाचा थोडा अभ्यास करा. याच धनगर समाजाला फार मोठा ज्वाजल्य इतिहास आहे. पुणे येथील हडपसर मध्ये 1802 साली होळकर आणि दुसरा बाजीराव पेशवा यामध्ये युद्ध झाले आणि या युद्धामध्ये होळकरांचा विजय झाला.
“लोकसभेसाठी मुनगंटीवार, अन् बावनकुळेंचं नाव चर्चेत, मराठवाड्यातील 8 ही जागा भाजप लढवणार”
पुढे दुसरा बाजीराव पेशवा हा कोकणामध्ये पळून गेला, याच दरम्यान होळकरांचा ताबा शनिवाड्यावर होता. त्यामुळे गोपीचंद पडळकर तुम्हाला धनगर समाजाविषयी थोडी जरी आपलुकी असेल तर हिमंत असेल तर शनिवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा. असं आव्हान सचिन खरात यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.
Read also
- “संजय राऊतांच्या एकाएका वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघतं”; विनायक राऊत
- “आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू”; रूपाली पाटलांनी घेतला या नेत्याचा समाचार
- “केंद्रात भाजप सरकार आहे, तोपर्यंत सोमय्यांच्या माकड उड्या सुरू”
- अब्दुल सत्तारांचा गेम होणार..? संपत्तीप्रकरणी तब्बल 1400 पानांची तक्रार CBI कडे दाखल
- “अंगावर आलात तर तुम्हालाही शिंगावर घेऊ”; राष्ट्रवादीचा कडक इशारा