पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत भाजप सोबत सत्ता स्थापन केली. भाजपचे 105 आमदार असुनही त्यांनी मुख्यमंत्री म्हणुन 40 आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदेंना संधी दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. जरी शिंदे मुख्यमंत्री असले तरी राज्याचा कारभार हा देवेंद्र फडणवीस चालवत आहेत अशी चिन्हं दिसत आहेत. याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य ही चर्चेचा विषय ठरला आहे.
“शिवसेना सोडली, तेव्हा पक्षप्रमुखांनी नारायण राणेंना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या”
भाजप नेते चंद्रकांत पाटील पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना म्हणाले की, गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती. जो योग्य मैसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असं असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दुःख झाले. मात्र वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेले देवेद्र फडणवीस हे आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
गृहमंत्रिपद मिळाल्यास तरच सरकारमध्ये सामील होऊ; अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मागील काही वर्षात आपल्यावर केसेस केल्या, आपल्याला उपटून टाकण्याचा प्रयत्न केला. पण आपण त्यांना पुरुन उरलो. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत आपण काय पराक्रम केला हे सर्वांनी पाहिला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून हिंदुत्व संपवण्याचा प्रयत्न केला जात होता, असाही आरोप चंद्रकांत पाटील यानी केला.
अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस कार्यकर्तांच्या पाठीशी उभे राहिले आणि राज्यात परिवर्तन घडुन आले आहे. राज्यातील सर्वच निवडणुकांत आपण नंबर एक ठरलो आहे. रेशन दुकानावर सर्वाना धान्य द्यावे यासाठी भाजपने खुप संघर्ष केल्या आहे, असंही चंद्रकात पाटील म्हणाले.
Read also
- “मुख्यमंत्री शिंदे हे केवळ रबर स्टँप असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतात”
- “..धमकी नंतर पोलीस विभागाला विशेष सुचना दिल्या होत्या”; वळसे पाटलांकडून मुख्यमंत्र्यांच्यावरील आरोपाचे खंडण
- मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे
- “मनसेला उपदेश देणाऱ्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीय”
- “शिवसेना सोडली, तेव्हा पक्षप्रमुखांनी नारायण राणेंना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या”