मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघीडीच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्री होते. महाविकास आघाडीच्या काळात जिल्हयातील काही निर्णयामुळे नक्षलवाद्यांकडून शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. या पत्रात शिंदेच्या कुटुंबाचाही उल्लेख होता. यानंतर एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली होती. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेना सुरक्षा देण्याबाबत नकार दिला होता, असा अरोप आमदार सुहास कांदे यांनी केला, तर आमदार शंभूराज देसाई यांनी त्याला दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आरोपाचे खंडण केले आहे.
दरम्यानच्या काळात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुरक्षा दिली होती. एवढेच नाहीतर शिंदे यांना नक्षलवाद्याकडून जी धमकी आली होती, त्यावेळी पोलीस विभागाला विशेष सुचना दिल्या होत्या, अस दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यामुळे जी चर्चा सुरू आहे, ती अनावश्यक असल्याचे म्हणत दिलीप वळसे पाटलांनी होत असलेल्या आरोपाचे खंडण केले आहे.
“मग त्यांनी ‘या’ दाढीला पकडलं, अन्..;”खैरेंचा एकनाथ शिंदे अन् फडणवीसांवर हल्लाबोल
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्री होते. दरम्यानच्या काळात जिल्हयाला घेऊन काही निर्णय घेतल्याने त्यांना नक्षलवाद्याकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. या पत्रात त्यांच्या घरातील कुटुंबीयांचा समावेश होता. चौकशी अंती यामध्ये तथ्य असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.
“आदित्य ठाकरेंचं जेवढं वय नाही तेवढं आम्ही राजकारण केलंय”; रामदास कदमांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
काम करत असताना धमक्या ह्या येणारच, नक्षली भागात उद्योग उभारत असताना ही घटना झाल्याचे सांगितले पण सुरक्षेबाबत काही विधान केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर देण्यास टाळले की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
Read also
- मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे
- “मनसेला उपदेश देणाऱ्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीय”
- “शिवसेना सोडली, तेव्हा पक्षप्रमुखांनी नारायण राणेंना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या”
- “शिवसेना सोडली, तेव्हा पक्षप्रमुखांनी नारायण राणेंना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या”
- गृहमंत्रिपद मिळाल्यास तरच सरकारमध्ये सामील होऊ; अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य