पुणे : एकनाथ शिंदे यांच्याशी आमची कौटुंबिक चर्चा झाली आहे. महाराष्ट्रात पुन्हा बाहेर पडणार आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहे. तसेच शंभुराजेंना विचारा कुणाचा फोन आला होता ते सांगतील. असं म्हणत शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षाबाबत भाष्य केले आहे.
“आदित्य अजून लहान आहे, त्यांनी कंस बोलावं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं”
मला वाईट वागणुक दिली हे मी आधी सुद्धा बोललो आहे आणि पुढे सुद्धा बोलेल. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला हे मी लवकरच बोलणार आहे. तर आदित्य ठाकरे याचे जेवढे वय नाही तेवढी राजकारणाची आमची वर्ष आहे. अशी खरमरीत टिका देखील त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत.
“राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
पोलिसांना परवानगी दिली तर आदित्य ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. शिवसेना हा प्रोटोकॉल पाळणारा पक्ष आहे, संपर्क प्रमुखाकडे दोन वेळा निरोप दिला आहे. अजून भेटीचा निरोप आलेला नाही, आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात आले आहेत. त्यामुळे मातोश्रीवर भेटण्याचा मुद्दा नाही, असेही शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. आज आदित्य ठाकरे यांचा नाशिकमध्ये मेळावा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे आता शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचं काम आदित्य ठाकरे करीत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभा होत असून त्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहे. तर बंडखोर आमदार देखील आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे.
Read also
- “पुणे महापालिकेत 100 पेक्षा नगरसेवक निवडून आणून फडणवीसांना गिप्ट देणार”; जगदीश मुळीक
- “आढळराव पाटलांची सेनेतून बाहेर पडण्याची वेळ चुकली”; सचिन अहिरांचं वक्तव्य
- “माझ्या हिमंतीवर मी निवडून येतो, मला कुणाची गरज नाही”; शिवाजीराव आढळराव पाटील
- “साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष ही विरोधी बाकावर बसण्यात गेलीत”; आव्हाडांनी सांगितला जुना किस्सा
- “ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका”; निलेश राणेंचं गंभीर वक्तव्य