पुणे : एखाद्या नेत्यांच्या पाठीमागे संघटना, पक्ष आगामी निवडणुकीसाठी भक्कम पणे उभी असते. परंतु ज्या पद्धतीने शिवाजीराव आढळराव पाटील सेनेमधून गेले आहेत. त्याचं दुर्दैव वाटत आहे. अजूनही ते सोबत राहिले असते तर त्यांना पक्षाकडून सहानुभूती मिळाली असती. असं शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
संघटनेमधून जे कुणी गेले आहे. त्याचा फार काही परिणाम संघटनेवर होणार नाही. एखाद्या नेत्यांच्या पाठीमागे संघटना, पक्ष आगामी निवडणुकीसाठी भक्कम पणे उभी असते. परंतु ज्या पद्धतीने शिवाजीराव आढळराव पाटील सेनेमधून गेले आहेत. त्याचं दुर्दैव वाटत आहे. अजूनही ते सोबत राहिले असते तर त्यांना पक्षाकडून सहानुभूती मिळाली असती. थिरूर मतदार संघातून त्यावेळी भाजपसोबत शिवसेना लढली होती. तरी देखील आमच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. याचे आत्मपरिक्षण करायला हवे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव यांचं टाईमिंग चुकलेलं आहे. त्यामुळे ते गेल्यामुळे त्यांचा काही परिणाम होईल असं काही वाटत नाही. अस शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.
“शिवसेनेच्या आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे”; दिपाली सय्यदचा सल्ला
पक्षाच्या नेतृत्वासोबत असो की लोकांसोबत असो माझा कुठेही डुल्बिकेटपणा नाही आहे. जर असता तर मी तिन वेळा निवडून आलो नसतो. काही उमेदवारांच्या प्रचारावेळी देखील मी माझा प्रचार सोडून त्यांचा प्रचार केला. तसेच शिवसेना आधार देणारा माणूस गेला आहे. त्यामुळे इतका बोबाबोंब सुरू झालं आहे. जरी सोडून गेलो असलो तरी शिवसैनिकांची माझ्यावर जबाबरदारी आहे. तसेच मी माझ्या हिमंतीवर निवडून येतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव..;” अमृता फडणवीसांच्या अनोख्या शुभेच्या
शिवसेनेचे नेते रविंद्र मिर्लेकर यांनी सेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी इशारा दिला आहे. ते कोणत्याही मतदार संघातून उभे राहिले तर आम्ही त्यांचा पराभव करू असा इशारा त्यांनी दिला आहे. रविंद्र मिर्लेकर यांनी जोरजोरात भाषणं देण्याशिवाय पक्ष संघटनेत कोणतंही काम केलं नाही. त्यांनी फक्त शिवसेनेत पुण्यात गेल्या 15 वर्षापासून फुट पाडण्याचं काम केलं आहे. शिंदे गटात फक्त तिकीट आणि खासदारीकीसाठी सामील झालो नाही. जरी राहिलो उभं तर तुम्ही कुणीही घेऊन या. तुम्ही कुठून तरी निवडून दाखवा. तसेच ज्या माणसाने आघाडीत असताना तिन वेळा मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. त्यांना तुम्ही शिकवता असा सवाल आढळराव पाटलांनी केला आहे.
Read also
- “माझ्या हिमंतीवर मी निवडून येतो, मला कुणाची गरज नाही”; शिवाजीराव आढळराव पाटील
- “साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष ही विरोधी बाकावर बसण्यात गेलीत”; आव्हाडांनी सांगितला जुना किस्सा
- “ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका”; निलेश राणेंचं गंभीर वक्तव्य
- “आदित्य अजून लहान आहे, त्यांनी कंस बोलावं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं”
- “राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं