पुणे : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. कारण शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार अजून कायम आहे. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना असून बाकीच्या मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला नाही. आता याच दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
“जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव..;” अमृता फडणवीसांच्या अनोख्या शुभेच्या
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, 1995 साली जेव्हा पहिल्यांदा युती सरकार विजयी झाले. म्हणजे पहिले बिगर काँग्रेस सरकार आले. तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आणि ते मुख्यमंत्री असतानाच काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. ते वर्षा बंगल्यावर राहत होते. त्यावेळेस मोबाईल नव्हते. आणि बॅलेट पेपरवरती मोजणी चालू होती. त्यामुळे निकाल यायला उशीर लागत होते. निकाल जसजसे येत गेले तसे वर्षा बंगल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना जाणीव झाली कि काँग्रेस बहुमत प्राप्त करू शकत नाही.
तर मग केंद्रात जाऊन अमित शहांचे पाय का चाटणार का? कांदेंवर दानवेंचा हल्लाबोल
ठरवलं असत तर बहुमत प्राप्तही करू शकली असती. पण, मला आठवतंय कि दुसऱ्याच दिवशी मी स्वतः वर्षा बंगल्यावर उपस्थित होतो. निकाल लागण्यापासून ते मनोहर जोशी यांचा शपथविधी होईपर्यंत. साहेबांकडे गेलेले ज्येष्ठ नेते.. त्यांची नावे मी इथे लिहू इच्छित नाही. त्या सगळ्यांनी साहेबांना आग्रह करत होते कि साहेब सरकार बनवूया. आपण सरकार बनवू शकता. तेव्हा साहेबांच वाक्य होतं.. ‘जनमत आपल्या विरोधात आहे. असं सरकार बनवणं योग्य नाही. त्यामुळे आपण विरोधी बाकावर बसायला हवं.’ हे वाक्य त्यांचे म्हणजेच पवार साहेबांचे आहे.
दिल्लीचा किंवा काँग्रेस हायकमांडचा काहीही संबंध नव्हता. मी ह्या सगळ्यांचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष हि विरोधी बाकावर बसण्यात गेली आहेत. साहेब पहिल्यांदा 1967 ला निवडून आले, तेव्हापासून आजपर्यंत ते विधी मंडळाचे नाहीतर संसदेचे सदस्य आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्यांसाठी मी हे लिहीत आहे अंसही ते म्हणाले.
Read also
- “ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका”; निलेश राणेंचं गंभीर वक्तव्य
- “आदित्य अजून लहान आहे, त्यांनी कंस बोलावं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं”
- “राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
- “राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
- “शिवसेनेच्या आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे”; दिपाली सय्यदचा सल्ला