नाशिक : राज्यात राजकीय उलथापालथ होऊन बरेच दिवस लोटले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या राजकीय युद्ध सुरू झालं आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे जाहीर सभांमधून बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. तर बंडखोर आमदार देखील आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. यातच आता एका सभेत औऱंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘दाढीवाला’ असा केला आहे.
“ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका”; निलेश राणेंचं गंभीर वक्तव्य
चंद्रकांत खैरे यांनी भाषणाची सुरूवात दमदार केली. इथे जमलेले सर्व ठाकरे परिवारातील आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मानणारे आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे हातवारे करत म्हणाले की, आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होते. असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सध्या झंझावती दौऱ्याचा उल्लेख केला.
“आदित्य अजून लहान आहे, त्यांनी कंस बोलावं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं”
एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यावर देखील चंद्रकांत खैरे यांनी ताशोरे ओढले. ते म्हणाले की, स्वार्थासाठई ही मंडळी एकत्र आली. आता पडेल. मग पडेल असं ते म्हणत होते. पण सरकार पडत नव्हतं. मग त्यांनी या दाढीला पकडलं आणि सुरूवात झाली. दाढीला समजतं नाही, अशा शब्दांमध्ये चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शिंतोंडे उडवले. त्यांनी एक चित्रपट काढला आनंद दिघेंवर. त्यात एक संवाद आहे, गद्दाराल माफी नाही, क्षमा नाही. मग आता आम्ही काय केलं पाहिजे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
“राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा झंझावती दौरा परवा भिवंडीपासून सुरू झाला आहे. इगतपुरी आणि त्यानंतर त्यांची नाशिक येथे जाहीर सभा झाली. याच दरम्यान नाशिकचे आमदार सुहास कांदे यांच्यात त्यांचा जोरदार शाब्दिक हल्ला झाला होता. सुहास कांदे आण आदित्य ठाकरे आमनसामने येणार असल्याची शक्यता होती. मात्र या दोन्ही नेत्यांची काल भेट झाली नाही.
Read also
- “आदित्य ठाकरेंचं जेवढं वय नाही तेवढं आम्ही राजकारण केलंय”; रामदास कदमांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
- “पुणे महापालिकेत 100 पेक्षा नगरसेवक निवडून आणून फडणवीसांना गिप्ट देणार”; जगदीश मुळीक
- “आढळराव पाटलांची सेनेतून बाहेर पडण्याची वेळ चुकली”; सचिन अहिरांचं वक्तव्य
- “माझ्या हिमंतीवर मी निवडून येतो, मला कुणाची गरज नाही”; शिवाजीराव आढळराव पाटील
- “साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष ही विरोधी बाकावर बसण्यात गेलीत”; आव्हाडांनी सांगितला जुना किस्सा