पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई ठाण्यातील सभेनंतर मनसेची आता 1 मे राजी औरंगाबाद येथे सभा होत आहे. परंतु या सभेला वंचित बहुजन आघाडींसह बच्चू कडू यांच्या प्रहारसह 5 संघटनांनी विरोध दर्शविला आहे. यांच्यासोबत आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील मनसेच्या औरंगाबाद येथील सभेला विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
“राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटणकरींनी जरा संभाळून”; मनसेचा राष्ट्रवादीला इशारा
अजान मशिदीमध्येच ऐकु येईल अशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे. मनसेने देखील मागणी केली आहे. ते त्यांना विचारा. परंतु भाजपने देखील पहिल्यापासून भूमिका भोंग्यांबाबत भूमिका घेतली आहे. भोंग्यांचा त्रास इतरांना होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात हुकुमशाही आली. लोकशाही स्वांतत्र्यावर गदा आली. आणीबाणीच्या काळात ज्या पद्धतीची स्थिती झाली होती. त्याच पद्धतीने उद्यापासून तुमचा भोंगा देखील बंद होईल. असा इशारा देखील त्यांनी पत्रकारांना दिला.
शिवसेनेने दिलेले चॅलेंज राणा दाम्पत्य पुर्ण करणार? कार्यकर्त्यांशी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता
महाराष्ट्रात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि ती येणारच नाही. राज ठाकरे यांना सभेसाठी परवानगी वगैरे काही लागत नाही. तुम्ही त्यांना परवानगी दिली नाही तर आणखी मोठी सभा होईल, असा इशारा देखील त्यांनी सत्ताधारी पक्षांना दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी येत्या 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंग्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मशिदीसमोरच मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Read also:
- “तुझा उद्योग तात्काळ थांबव, नाहीतर…”; अमोल मिटकरींना भाजप नेत्याचा इशारा
- ..अन् अजित पवार भाजप नेते लक्ष्मण जगतापसाठी धावले रूग्णालयात! राज्यभरात एकच चर्चा
- “राज ठाकरे त्यांच्यासोबत होते, तेव्हा गुलुगुलु अन् आता खाजवायाला लागले”; फडणवीसांचा हल्लाबोल
- “अरे धनु बाळा, थांबल्या का तुझ्या छातीतील कळा”; वंसत मोरेंचा धनंजय मुंडेंला टोला
- “मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत..;” रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?