नाशिक : ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला आहे. असा घणाघात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर चढवला. अलिकडेच ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने खुन केला आहे असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पक्षशिस्तीचे पालन न केल्यास..; मनसेकडून पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर भाष्य न करण्यास सुचना
पुढे बोलताना ते म्हणाले की, 2010 मध्ये कृष्णमुर्ती अहवालानंतर जनगणना करा असे आम्ही सांगितले होते. त्यानंतर 2016 मध्ये जनगणना संपल्यापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे होता. देशात, राज्यात भाजप सरकार होते. फडणवीसांनी तेव्हा काही केले नाही. दोन वर्ष आम्ही आणि तुम्ही सगळे जण मुखपट्टी लावून घरी बसलो होते. तुमच्यामुळे महाराष्ट्राच नाही तर मध्यप्रदेशसह सर्व राज्य अडचणीत आलं आहे. ट्रिपल टेस्ट पुर्ण होत नसून हे पाहून त्यांनी डेटा मागिविला.
“काही असुंतष्ट आत्मे पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवताहेत, अशा लोकांपासून पक्षाला धोका”; वसंत मोरे
आमचे काम रात्रदिवस चालु होते. प्रत्येक राज्यात कायदा करत असताना फडणवीसाचं सहकार्य मागण्यासाठी घरी गेलो. देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत. तुम्हाला काय सुचवायचे आहे ते सुचवा, प्रत्येक गोष्टीत राजकारण नको, आमचं पुढील पाऊल म्हणजे मंगळवारी मध्यप्रदेशच्या निर्णयानंतर घेऊ, आरक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही या निवडणुकीत करू, ओबीसी डेटा बाठिया कमिशन करून आम्ही घेऊ, तुम्ही सुद्धा तिथे जाऊन कसे करायचे ते सांगा असंही ते म्हणालेत.
“आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवले”; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर घणाघात
दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहेत. सातत्याने एकमेकांवर यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी यातून तोडगा काढणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
Read also:
- राज्यातील राजकारण्यांना हिंदुत्वाचा वायरस; रोहित पवार, राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेही करणार अयोध्या दौरा
- “मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी तिथे निवडणुक लढवेन”; नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
- “रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
- “टोमणे कट्टा एक डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांच्या टीमने तयार रहावं”; सभेआधी मुख्यमंत्र्यांना भाजपने डिवचलं
- “निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो, पुढच्या सभेत मनातलं बोलणार”; उद्धव ठाकरे