मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण हे मनसेभोवती फिरत आहे. कारण राज ठाकरे यांनी घेतलेली मशिदीवरील भोंग्यांबातच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यासंदर्भात अनेक घडामोडी राज्यात घडत आहेत. त्यामुळे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. त्यांबाबत त्यांनी एक परिपत्रकचं काढलं आहे.
“भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
मनसेने काढलेल्या परिपत्रकात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेन पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यामांमध्ये मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रवक्ते करीत असतात. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रवक्त्यांव्यतिरियेक्त इतर कोणीही प्रसारमाध्यामांसमोर राजकीय भूमिकांबाबत भाष्य करू नये, अशा सुचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
त्याचबरोबर पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर वा अन्यत्र कुठेही राजकीय टीका-टिप्पणी करताना भाषेचे भान बाळगावे. पक्षशिस्तीचे पालन प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला करावेच लागेल, अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल, अशा इशारा देखील देण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
दरम्यान, राज्यात सध्या हनुमान चालिसा लावण्यावरून मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आले आहेत. तसेच मनसे आणि सत्ताधारी पक्षांमध्ये सध्या जोरदार खंडाजगी सुद्धा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.
Read also:
- “काही असुंतष्ट आत्मे पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवताहेत, अशा लोकांपासून पक्षाला धोका”; वसंत मोरे
- “आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवले”; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर घणाघात
- शिरूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय ‘ठिणगी’; ‘पुढचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलच होणार !’, राऊतांची घोषणा
- राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
- “राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली