मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आहेत. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा सध्या जोरात तापला आहे. औरंगाबाद मध्ये त्यांनी १ मे रोजी यावर सभा घेतली. लाऊडस्पीकर उतरवण्याचा अल्टिमेटम त्यांनी ४ मेला दिला. यानंतर महाराष्ट्रात वातावरण गढूळ होईल की काय? याबाबत वेगवेगळे निष्कर्ष बांधले जात होते. तर अनेक ठिकाणी या भोग्यच्या वादावरून गदारोळ देखील झाला. अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवायादेखील केल्या. औरंगाबादमधील सभेवेळी राज ठाकरे याना काही नियमावली बांधून दिली होती मात्र त्यातील काही नियमांचा भंग केल्याने राज ठाकरे यांचावर कारवाई करण्यात आली. आता त्याचं औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील सभा होणार असलयाचे जाहीर झालं आहे.
उद्धव ठाकरेंचा भावाला धक्का; कल्याण डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते शिवसेनेत
८ जूनला शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादेत जाहीर सभेला संबोधित करतील. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शहरातील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर अनेक वेळा जाहीर सभा घेतल्या. त्याच ठिकाणी राज ठाकरे यांनी नुकतीच मोठी सभा घेतली. मनसेच्या या मेळाव्यात हे मैदान खचाखच भरले होते. एकीकडे आता शिवसेनेनेही या मैदानावर जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे एआयएमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनीही जाहीर सभेची तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेनं सभेची घोषणा केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली, ते म्हणाले की, “आम्ही जाहीर सभाही घेणार आहोत. मनसेच्या सभेत मैदान खुर्च्यांनी भरले होते पण आम्ही मैदानात दुप्पट संख्येने लोक जमा करू.” राज ठाकरेंच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अनेक अटींसह परवानगी दिली. आता शिवसेना आणि नंतर एमआयएमच्या जाहीर सभेला पोलीस अटींसह परवानगी देणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण मनसेप्रमाणे शिवसेनेच्या सभेलाही लाखोंच्या संख्येत शिवसैनिक जमा होतील.
आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र..म्हणाले,
शिवसेननं मुंबईनंतर मराठवाड्यात मोठा शाखा विस्तार केला. याची सरुवात झाली होती ८ जुन १९८५ ला. मराठवाड्यातली पहिली शाखा या दिवशी स्थापन झाली. या शाखेचा ३७ वा स्थापना दिन औरंगाबादेत पार पडणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत या सभेला परवानगी मिळाली. औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेनेला या जाहीर सभेला परवानगी मिळाल्याचं स्पष्ट केलं. तर लवकरच त्यांना पोलिसांची परवानगीही मिळणार असल्याचं बोललं जातंय. अंबादास दानवे म्हणाले की, “शिवसेनेची ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या सभेला जमणार आहेत. ही बैठक रेकॉर्डब्रेक ठरणार आहे.” असं ते म्हणाले. या मेळाव्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, असं सांगायला ते विसले नाहीत. ते पुढे म्हणाले, “आम्हाला ताकद दाखवायची गरज नाही, या शहरात आम्ही मजबूत ताकदीत आहोत.”
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याआधी औरंगाबाद शहर पोलिसांनी बराच वेळ घेतला होता. अनेक बैठका घेऊन मनसेला परवानगी देण्यात आली. यादरम्यान त्याच्यावर १६ अटीही घालण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये केवळ १५ हजार लोकच मैदानात येऊ शकतील अशी मुख्य अट होती. अधिक लोक आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. उद्धव ठाकरेंच्या सभेलाही मोठी गर्दी जमणार असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत शिवसेनेच्या बैठकीत औरंगाबाद पोलिस कडक अटी घालणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
Read also:
- “राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
- “भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
- स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
- राष्ट्रवादीला लागले हिंदुत्वाचे वेध? सहकुटुंबासह रोहित पवार आयोध्यत दाखल; राज्यात एकच चर्चा
- ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील