जळगाव – मागील काही दिवसांपासून भोंग्याच्या वादामुळे राज्याच्या राजकारणात धुमशान चालू आहे. त्यातच राज ठाकरेंच्या या भोंग्याच्या मुद्द्याला भाजपने समर्थन केल्याने महवाईकास आघाडीत अजूनच आग पेटली आहे. यावरून महविकासाआघाडीतील नेत्यांचे टीकास्त्र हे राज ठाकरेंवर सोडले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरले आहे. यावरून शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
मनसे नेते संदीप देशपांडे अजूनही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक
राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या आहेत, आता त्यांनी भोंगा आणला; मात्र, त्याचा ठेंगा झाला आहे, अशी टीका पाटील यांनी केली. आतापर्यंत तिसऱ्यांदा राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे.समोरही ते आपली भूमिका बदलत राहतील. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सर्व समाजाला सोबत घेण्याची भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी झेंडाही चार रंगांचा ठेवला होता.
“कशासाठी काढताय तुम्ही भोंगे..का करताय तुम्ही अशी सोंगे?”; आठवलेंनी टोचले ठाकरे बंधूंचे कान
तर मनसेच्या स्थापनेपूर्वी त्यांनी मराठीची भूमिका घेत उत्तरप्रदेशच्या लोकांच्या कानफटात मारली. त्यानंतर पुन्हा आपली भूमिका बदलली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मग पुन्हा मोंदीच्या विरोधी भूमिका घेत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांच्यावर टीकाही केली. नंतर मनसेच्या झेंड्याचा रंग बदलविला. आता त्यांनी ‘भोंगा’ काढला. मात्र आता त्याचा ‘ठेंगा’ झाला आहे, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
Read also:
- “भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
- स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
- राष्ट्रवादीला लागले हिंदुत्वाचे वेध? सहकुटुंबासह रोहित पवार आयोध्यत दाखल; राज्यात एकच चर्चा
- ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील
- आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र..म्हणाले,