मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून भोंग्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भोंग्याबाबत भुमिका आणि त्याला मिळालेलं भाजपचं पाठबळ यामुळे राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज देखील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला आहे.
मला वाटतं लाऊडस्पिकरचा मुद्दा संपलाय. कायद्यानुसार काम केले जाईल. महाराष्ट्रात आज शांतता आहे, कुठंही भांडण नाही, सगळं ठिक आहे. माहौल बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातील जनतेनं त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे. लाऊडस्पिकरबाबत संपूर्ण देशाकरता एक धोरण तयार झालं पाहिजे, ते सरकारनं करावं, असं संजय राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, लाऊडस्पिरच्या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदु समाज आहे. हिंदु समाजात फुट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपचा एकही नेता महागाईवर बोलत नाही. भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नव्हता. फक्त हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्यासाठी तो काढला गेला. पण हा मुद्दा उठलाच नाही. कोर्टाच्या निर्णयानुसारच राज्यात काम होत आहे.
या आंदोलनाचा सर्वाधिक फटका आज हिंदूंनाच बसला आहे. भजन-किर्तन करणाऱ्यांना धक्का बसला. या भूमिकेवर सर्वाधिक नाराज हिंदू समाज आहे. हिंदू समाजात गट निर्माण करण्याचा कट होता. पण तसं होऊ शकलं नाही. महाराष्ट्राची जनता सुजाण आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज यांच्या मागे कोर्टाचा ससेमिरा; राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ
संजय राऊत यांनी त्यांनतर महागाईवरुन केंद्रावर टीका केली. ते म्हणाले की, देशात महागाई इतकी वाढलीय की त्यावर कुणी केंद्रातला नेता बोलत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहेत. पण इथं देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर यासंदर्भात भाजपचा एकतरी नेता, मंत्री बोलतोय का? भोंग्यांवर कसले बोलता. महागाईवर बोला. भोंग्यांवर बोलणं तुमचं कर्तव्य नाही, महागाईवर बोलणं तुमचं कर्तव्य आहे, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
Read also:
- राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
- स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
- राष्ट्रवादीला लागले हिंदुत्वाचे वेध? सहकुटुंबासह रोहित पवार आयोध्यत दाखल; राज्यात एकच चर्चा
- ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील
- आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र..म्हणाले,
- उद्धव ठाकरेंचा भावाला धक्का; कल्याण डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते शिवसेनेत