मुंबई : हनुमानाचं नाव घेतल्यानेे राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे. 14 दिवस आम्हाला तुरूंगात ठेवणाऱ्या या मुख्यमंत्र्यांचा अंहकार मोडला जाईल. जे रावणाचं झालं तेच मुख्यमंत्र्यांचं होणार आहे. हनुमान आणि रामभक्त उद्धव ठाकरे यांची लंका खाक करतील असा इशारा आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तब्बल 14 दिवसांनी त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिसांवर गंभीर आरोप करीत म्हणाले की, पोलिसांनी आम्हाला जामीन देणार म्हणून पोलीस ठाण्यात नेलं. त्याठिकाणी त्यांनी आम्हाला चहा दिला. त्यानंतर रात्री 12 नंतर सांताक्रुझ तुरूंगात आम्हाला टाकलं. त्याठिकाणी त्यांनी पाणी तसेच बाथरूम वापरू दिलं नाही. पंखा, चटई आम्ही मागत होतो पंरतु त्यांनी ते देखील दिलं नाही. एका महिलेचा इतका छळ करणे, मुख्यमंत्री एका महिलेला घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची सक्तीची कारवाई आमच्यावर केली आहे. असा आरोपही त्यांनी लावला.
राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा कार्यक्रम राणा दाम्पत्यांच्या चांगलाचं अंगलट आला. मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र उच्च न्यायालयाने तपासणी केली असता. त्यांच्यावर राजद्रोहाचा गन्हा चूकीच्या पद्धतीने लावला गेला असा निर्णय दिला.
“राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
दरम्यान, दोन लहान मुलं आणि वृद्ध आई-वडिल घरात होते. शिवसेना कार्यकर्ते घरावर दगडफेक करत होते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. उद्धव ठाकरे , संजय राऊत, अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईलवर कारवाई करायला हवी. सत्तेचा दुरूपयोग करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करावी, दिल्लीला जाऊन आम्ही ही मागणी करणार असल्याचंही रवी राणा यांनी सांगितले.
Read also:
- “टोमणे कट्टा एक डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांच्या टीमने तयार रहावं”; सभेआधी मुख्यमंत्र्यांना भाजपने डिवचलं
- “निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो, पुढच्या सभेत मनातलं बोलणार”; उद्धव ठाकरे
- पक्षशिस्तीचे पालन न केल्यास..; मनसेकडून पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर भाष्य न करण्यास सुचना
- “काही असुंतष्ट आत्मे पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवताहेत, अशा लोकांपासून पक्षाला धोका”; वसंत मोरे
- “आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवले”; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर घणाघात