मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाचा वायरस चांगलाचं पसरत चालला आहे. कारण की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिकडच्या सभेत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावरून वादळ उठलं आहे. राज ठाकरे हे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी तशी घोषणा देखील केली. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारही सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर सहकुटुंबासह गेले आहेत. अशातच संजय राऊतांनीही आयोध्या दौऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
“काही असुंतष्ट आत्मे पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवताहेत, अशा लोकांपासून पक्षाला धोका”; वसंत मोरे
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे येत्या 10 जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी त्यांनी आयोध्येमध्ये नकली भावनेतून जाणाऱ्या रामल्लाचा आशीर्वाद मिळत नाही. त्यांचा विरोधचं होणार असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर मिश्किल टिप्पणी केली. अयोध्यात किंवा उत्तर प्रदेशात असली नकली बॅनर कुणी लावले माहिती नाही. पंरतु उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवले”; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर घणाघात
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी आमची ताऱिख 10 जून ठरतेय असंही त्यांनी सांगितलं. तसेच राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा 5 जून रोजी होणार आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे अयोध्यात जाणार आहेत. त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2018 साली अयोध्याचा दौरा केला होता. त्यामुळे अयोध्या दौऱ्याबाबत राज्यातील लोकांना खुपच उत्सुकता लागून आहे.
दरम्यान, रोहित पवारही उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यासंबंधी फेसबुकवर पोस्ट सुद्धा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडला आहे की, राज्यातील राजकारण्यांना हिंदुत्वाचा वायरस लागला असून ते सध्या अयोध्या दौरा करीत आहेत. राज्यातील अडचणी दुर व्हाव्यात किंवा त्यावर भाष्य़ करण्याची गरज असून राजकीय अयोध्या दौऱ्यावर मुश्गुल आहेत का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
Read also:
- “मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी तिथे निवडणुक लढवेन”; नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
- “रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
- “टोमणे कट्टा एक डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांच्या टीमने तयार रहावं”; सभेआधी मुख्यमंत्र्यांना भाजपने डिवचलं
- “निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो, पुढच्या सभेत मनातलं बोलणार”; उद्धव ठाकरे
- पक्षशिस्तीचे पालन न केल्यास..; मनसेकडून पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर भाष्य न करण्यास सुचना