पुणे – पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, पुतळ्याच्या अनावरणासाठी राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आले. यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही. आम्हीच त्यांना उशिरा कळवले होते, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
ठाकरे – पाटील विवाहला लागली कोरोनाची नजर, आता अंकिता पाटील देखील कोरोना पॉझिटिव्ह
३ तारखेला जयंतीदिनी अनावरण करण्याचा प्रयत्न होता. पण काम अर्धवट राहिले. त्यातच राज्यपालांना एक महिना आधी कळवण शक्य नव्हते. काम पूर्ण होईल याची शाश्वती नव्हती. राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, कारण त्यांना आम्ही उशिरा सांगितले. आता ९ तारखेला संध्याकाळी विद्यापीठातील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होईल. त्यावेळी राज्यपाल याठिकाणी येतील, असे भुजबळ यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानाचीही छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली. नारायण राणे मोठ्या पदावर आहेत, ते केंद्रीय मंत्री आहेत. राज्य सरकारचे ५० हजार कोटी केंद्राकडे अडकले आहेत. त्यांच्याकडून फार अपेक्षा उंचावल्या आहेत. आता केंद्रांनी मोठ्या योजना त्यांनी राज्यासाठी आणाव्यात, असा टोलाही भुजबळांनी राणेंना लगावला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; यापुढे सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक
त्याचबरोबर, आवश्यक असलेली सर्व पूर्तता शासनाच्यावतीने केलेली आहे. १२ कोटी जनतेची करायची आहे. कोरोनाकाळात घरोघरी जाऊन जनगणना करणे अन्यायकारक ठरेल. आरक्षण टिकावे हीच इच्छा आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र, आता लॉकडाउन करावा अशी इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read also:
- आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
- ‘एका बँकेवर विजय मिळवून राज्यात सत्ताबदलाची बोंब मारणे म्हणजे भाकडकथा’; सामनातून नारायण राणेंना चिमटे
- पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
- राज्यात पुन्हा लॉकडाउन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत