मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा पवार घराणं असेल हे दोन्ही नेते केवळ फक्त स्वतःच्याच मुलांचं करियर घडवताय, इतर युवा वर्ग पिचलेला आहे. म्हणून आम्ही युवकांना स्वतःसोबत जोडून घेत आहोत, असं वक्तव्य भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केलं.
मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब
आम्ही युवा वॉरियर ही संकल्प यात्रा मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून सूरु केली. तितल्याच युवकांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीयेत. असंख्य युवा वर्ग आमच्याशी जोडला जातोय त्यांच्या समस्या सांगतोय. संपूर्ण महाराष्ट्रात आमचा हा दौरा सुरु आहे. पुरग्रस्त जिल्हे सोडले तर सगळीकडे आम्ही दौरा केला आणि युवकांना पक्षाशी जोडलं. युवकांना फक्त आश्वासनं दिली गेली त्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. मुख्यमंत्री असतील, पवार घराणं असेल, हे केवळ फक्त स्वतःच्याच मुलांचं करियर घडवताय, इतर युवा वर्ग पिचलेला आहे. म्हणून आम्ही युवकांना स्वतःसोबत जोडून घेत आहोत, असं विक्रांत पाटील म्हणाले.
सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी; चंद्रकात पाटलांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
संपुर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा दौरा सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रमधील ११ जिल्हे आमचे पुर्ण झाले आहे. विदर्भातील सर्व जिल्हे आम्ही पुर्ण केले. कोकणातील जिल्हे पुर्ण केले. महाराष्ट्रावातील पुरपरिस्थितीचे जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांचा दौरा आम्ही केला. पत्येक जिल्ह्यात आम्हाला युवकाचे नव चैत्यन्य दिसून आलं. त्यांचा एकच म्हणंन आहे की, आम्हाला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युवा वारियर्सचे सदस्य व्हायचयं. युवा पिचले गेलेले आहेत. त्यांचे प्रश्न कोणीच सोडवले गेले नाही. त्यामुळे, राज्यात जे काही चाललयं ते सगळ संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही विक्रांत पाटील म्हणाले.
Read Also :
- रोहित पवारांचा भाजपला दे धक्का: अजितदादांच्या उपस्थितीत कर्जतच्या मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
- महापालिका रणधुमाळी: नाशिकमध्ये 40 प्रभाग तीन सदस्यांचे, एक 2 सदस्यांचा, शिवसेनेत नाराजीचा सुर
- महापालिका रणधुमाळी २०२२: भाजप-राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, काँग्रेसमध्ये मतभेद, आघाडीत बिघाडी कोणाची?
- २०२२ च्या महापालिका निवडणुकासाठी 3 सदस्यांचा प्रभाग होणार; राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
- किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला; राजकीय वाद पेटण्याची शक्यता