मुंबई : राज्याचे मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतंय. मुंबई महानगरपालिकडील महाराष्ट्र त्यांना माहिती नाही. अडीच वर्षाच्या काळात ते एकदाच ते सोलापुरच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेड अंथरण्यात आले होते. त्याच्या पलीकडे ते गेले नाहीत. कुणाच्या बांधावर जाण्याचे ते कष्ट घेत नाहीत. अस म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“मनसे सारख्या टुकार पक्षाचा एकही आमदार निवडून आणताना जनतेने विचार करावा”
देवेंद्र फडणवीस यांनी औसा तालुक्यातील रस्त्याचं लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आले असता त्यावेळी ते बोलत होते. आमदार अभिमन्यु पवार यांनी रस्त्याचं प्रश्न मांडला होता. त्यानंतर जवळपास औसा तालुक्यातील १ हजार ३०० किलोमीटर रस्त्याच्या कामाचं लोकापर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर 2 हजार 500 एकर फळबागांसह 1 हजार पशू गोठ्यांचे लोकार्पणही त्यांनी केलं.
“औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री लवकरच गुडन्युज देणार”; चंद्रकांत खैरे
अमृत योजनेत तर सार्वधिक निधी हा महाराष्ट्राला मिळाला. मुंबईचा खरा विस्तार येणाऱ्या काळात हा मुंबईलगतच्या भागात बघायला मिळणार आहे. या भागात गुंतवणुक करण्याची संधी अनेक आहे आणि त्यामुळेच विकासाला मोठा वाव आहे. असंही ते म्हणाले.
इतिहासात नोंद आहे, ही निवडणुक आम्हीच जिंकणार”
नवीन महापालिका तयार झाल्या की, काही काळ समस्या असतात. विशेषत: कराचे प्रश्न अधिक असतात. मात्र त्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे आहेत. सरकार आणि महापालिकांनी एकत्र बसून असे प्रश्न सोडावायचे असतात. असंही ते म्हणाले.
Read also:
- “गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार
- “राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना
- “पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा
- संजय राऊत व त्यांच्या सेनेने मग तुमची धूनी भांडी करायची का ?
- “चित्रपट बघून मोदी अश्रू गाळतात, पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर ते बोलत नाही”