मुंबई : राज्यातील महामारीच्या बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरुवातीला १५ दिवस कडक निर्बंध लागू केले. मात्र, रुग्णसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ पाहून, लॉकडाऊन मध्ये देखील हळूहळू राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आणि सध्या राज्यात १ जूनपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान, आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत, राज्यात आलेली महामारीची दुसरी लाट ओसरत असली आणि बाधित रुग्णांमध्ये सातत्याने होणारी वाढ लॉकडाऊनमुळे कमी होत असल्याचं दिसून येत असलं तरी, धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे १ जूननंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याची चर्चा झाल्याची माहिती आहे.
तसेच, राज्यातला रुग्णवाढीचा दर कमी होत असला, तरी १० ते १५ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ झपाट्याने होत असून, म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढत आहे. महामारीच्या बाधित रुग्णवाढीचा दर आणि संख्या, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये उच्चांकी पातळीवर पोहचली होती. याउलट सध्याची राज्यातील रुग्ण संख्या कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे.
त्यामुळ १ जूननंतर लॉकडाऊन एकदम न उठवता, तो हळूहळू टप्प्याटप्प्याने आवश्यक ते निर्बंध शिथिल करून उठवला जाईल, अशी चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या त्या विभागास निर्देश दिले आहेत.
Read Also :