मुंबई : सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये कमळाबाई प्रकरणावरून चांगलाच वाद पेटला आहे. शिवसेनेने आपल्या सामनातून भाजपवर कमळाबाईचा उल्लेख करीत निशाणा साधला आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजप शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला आता पेग्विंन सेना म्हणायचे का ? असा सवाल केला आहे. यातच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील याप्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
“दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
दोन हात करता येत नाही म्हणून, फोडा, झोडा मजा पहा, हेच तर कमळाबाईचं मिशन आहे. अशी टिका सामानाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे. यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, सत्ता गेली पण शहाणपण आलेले दिसत नाही. भाजपला कमळाबाई म्हणून शिवसेनेला नेमकं काय सुचवायचे आहे? ही कमळाबाई शिल्लक सेनेला चिमटीत उचलून गरागरा फिरवेल इतकी शक्तिशाली आहे. स्वत: ला पक्ष सांभाळता आला नाही. त्याचा दोष दुसऱ्याला का द्यावा? असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.
“आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
मराठी माणसाला आपापसात लढवलं जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते, अशी टिका सामनातुन करण्यात आली होती. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आठवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय ? नाचता येईना अंगण वाकडे! स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार शिवसेनेला प्रतुत्तर दिलं आहे.
“तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
दरम्यान, शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत भाजपचा उल्लेख कमळाबाई केला आहे. अमित शहा यांंच्या मुंबई दौऱ्यावरून देखील त्यांनी भाजपवर टिका केली आहे. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
सत्ता गेली पण शहाणपण आलेले दिसत नाही
भाजपाला कमळाबाई म्हणून शिवसेनेला नेमकं काय सुचवायचे आहे..?
ही कमळाबाई शिल्लक सेनेला चिमटीत उचलून गरागरा फिरवेल इतकी शक्तिशाली आहे..
स्वतःला पक्ष सांभाळता आला नाही त्याचा दोष दुसऱ्याला का द्यावा..??@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @cbawankule pic.twitter.com/CNlkWmubev— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 5, 2022
Read also
- “तुषार भोसलेंनी आपल्या लायकीप्रमाणे बोलावे, ढोंगी आचार्य..;” राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
- “तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
- “शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”