मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई – बसचा लोकार्पण सोहळा, आज माहिम बसस्थानकात पार पाडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी, लोकल आणि रेस्टोरंट बाबत महत्त्वाचे विधान केले असून, राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक सूचक विधानही केले आहे. तसेच, नाव न घेता त्यांनी “बसमध्ये बेल वाजवत कंडक्टर आगे बढो सांगतो, तसा आगे बढो सांगणारा कोणी पंतप्रधान पाहिजे,” असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.
संजय काका पाटीलांसारखा घातकी मित्र आयुष्यात नको, बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि मग पाडले
यावेळी, “बेस्टचा प्रवास हा अभिमानास्पद आहे. १८७४-२०२१ पर्यंत बेस्टमध्ये अभूतपूर्व असा बदल होत गेला”, असे सांगत, “ट्राममधून माँसाहेब आम्हाला फिरायला न्यायच्या,” अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच, “कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत असून, ई-बसचा उपक्रम म्हणून महत्वाचा आहे. कोरोना काळात बेस्ट अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी सज्ज राहिली. जनतेची सेवा हाच बेस्ट कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
दरम्यान, हॉटेल-रेटस्टोरंट आणि लोकल बाबत बोलताना त्यांनी, “२-४ दिवसांत रेल्वे, रेस्टोरंट बाबत निर्णय घेऊ. सध्या लोकल बंद आहे, पण ‘कमरे मे बंद है चावी खो गई है’ अशी आपली अवस्था नाही. थोडं धीराने, थोडं दमाने घ्या. ओसरलेला कोरोना उलटणार नाही ना ही भीती आहे. दुसरी लाट आली ती झपाट्याने. तशीच तिसरी लाट येऊ नये म्हणून हि काळजी आहे. मात्र नक्कीच दिलासा देण्याचा प्रयत्न असेल”, असे त्यांनी सांगितले.
मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर
तसेच, ऊन, वारा, पावसात मुंबईकराचा बेस्ट आणि लोकल रेल्वेशी संबंध येतो. आदित्यने सांगितलं सरकारच्या वचननाम्यात म्हटलं होतं, एकच तिकीट सगळ्यांसाठी पाहिजे. तयच धर्तीवर बेस्टची सिंगल तिकीट सिस्टिम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. बेस्ट, रेल्वे आणि मेट्रो या सगळ्यासाठी एकच तिकीट चालू शकेल. निर्बंध शिथिल करण्याबाबत विचारणा होत आहे. चावी आपल्या हातात आहे, त्यामुळे अंदाज घेऊन ती कशी फिरावायची हे ठरवू”, असं म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला आहे.
Read Also :
- … तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना ३०% जागा देणार, काँग्रेसची मोठी घोषणा
- “दगडातूनही तेल काढू शकतात, भलताच ब्रिलियंट माणूस”, राज्यपालांकडून गडकरींचं तोंडभरून कौतुक
- ९ मिनिटांच्या क्लिपमध्ये अखेर दडलंय तरी काय? भाजप मनसे युतीच्या प्रवासातील दुसरा एपिसोड
- महापालिका रणधुमाळी : आदित्य ठाकरेंकडे महापालिकेची जबाबदारी तर, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार
- भाजप प्रदेश अध्यक्ष बदलणार ? चंद्रकांत दादा चार दिवस दिल्लीत