नागपुर : शनिवारी (१४ ऑगस्ट) केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्फोटक पत्र लिहिलं. यात त्यांनी, शिवसैनिकांच्या दहशतीमुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद पडतील. त्यांच्याकडून अधिकारी, तसेच कंत्राटदारांना भंडावून सोडले जात असून, कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत ही मजल गेली आहे. हे प्रकार सुरुच राहिले, तर राज्यात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत विचार करावा लागेल,” असा थेट इशारा दिला.
दरम्यान, आता यावरून गडकरींच्या उपस्थितीत आज महामेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क उदघाटन सोहळा पार पडला. १.६ किलोमीटर लांब या मार्गाच्या उदघाटनाअंतर्गत, झिरो माईल स्टेशन आणि कस्तुरचंद पार्क स्टेशन व फ्रिडम पार्कचे देखील उदघाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात गडकरींच्या ‘त्या’ पत्रावर भाष्य करत, आपले मौन सोडले.
गडकरींच्या स्फोटक पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत, पोलीस महासंचालक दिले महत्त्वाचे आदेश
ते म्हणाले, “नितीनजी तुम्ही प्रेमळ आहात, मात्र पत्र कठोर लिहिता. तुमचं आणि आमचं नातं थोडसं वेगळंच आहे. शिवसेनाप्रमुखांची शिकवण आपण सुद्धा घेतलेली आहे, ती म्हणजे जनतेसोबत कधीही गद्दारी करायची नाही, विश्वासघात करायचा नाही. मी आपल्याला शब्द देतो, कोणत्याही प्रकारे जनतेचा मी विश्वासघात करणार नाही आणि आणि विश्वासाच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही.”
“शिवसैनिकांना आवरा नाहीतर…”, गडकरींचे मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र
दुसरीकडे, गडकरींचे पत्र प्राप्त झाल्यांनतर त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गडकरींच्या पत्रावर संशय घ्यायला सुरुवात होती. मात्र या पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्कळ दखल घेतली आणि याप्रकरणी त्यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले त्यांनी कत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मागितली आहे.
Read Also :
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा
- लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण
- ब्रेकिंग! पारनेर तहसिलदाराने आमदार लंकेच्या जाचाला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा!
- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी
- मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्रानं घ्यावी, पण अशोक चव्हाण कुठे आहेत? संभाजीराजे आक्रमक