नागपुर : शनिवारी (१४ ऑगस्ट) केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्फोटक पत्र लिहिलं. यात त्यांनी, शिवसैनिकांच्या दहशतीमुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद पडतील. त्यांच्याकडून अधिकारी, तसेच कंत्राटदारांना भंडावून सोडले जात असून, कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत ही मजल गेली आहे. हे प्रकार सुरुच राहिले, तर राज्यात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत विचार करावा लागेल,” असा थेट इशारा दिला.
गजानन काळेंच्या पत्नीचा गौप्यस्फोट, पोलिसांकडून माझ्यावर सेटलमेंटसाठी मानसिक दबाव
दरम्यान, यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, भाजप आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला असून, “गडकरींचे पत्र दिल्लीच्या नेत्यांच्या राजकीय दबावातून तर नाही ना? आता कुणाच्या इशाऱ्याने गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे? कारण, गेली २५ वर्ष जेव्हा दोन्ही पक्ष सोबत होते. तेव्हा त्यांना काही अडचण नव्हती”, अशी टीका करत त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
नितीन राऊतांच्या मनात नाना पटोलेंबद्दल अढी? नागपूर काँग्रेसमध्ये मतभेदाच्या चर्चेला उधाण
तसेच, कामात कुणाचा अडथळा येत असेल, तर कॉंग्रेस गडकरींच्या पाठीशी आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला भष्ट्राचार व कामाचा निकृष्ठ दर्जा हे व्यवस्थित करावे व याची श्वेत पत्रिका काढावी” अशी मागणी पटोले यांनी केली. त्यांना वरुन दाढीवाल्यानं आरोप करायला सांगितलं का? असा खोचक सवालही त्यांनी गडकरींना केला आहे.
“शिवसैनिकांना आवरा नाहीतर…”, गडकरींचे मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र
दरम्यान गडकरींच्या पत्राची, मुख्यमंत्र्यांनी तात्कळ दखल घेतली असून, याप्रकरणी त्यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. त्यांनी कत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मागितली आहे. त्यामुळे, चिथावणी देऊन महामार्गांची काम बंद पाडणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
Read Also :
- राजकीय कटकारस्थान रचून मला अडकविण्याचा प्रयत्न; बीएचआर प्रकरणावरून आमदार मंगेश चव्हाण संतापले
- “मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; शिवसेना नेत्याला धमकी
- गडकरींच्या स्फोटक पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत, पोलीस महासंचालक दिले महत्त्वाचे आदेश
- विरोधकांनी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी किरीट सोमय्याला चुकीची महिती दिली – आमदार सुनिल शेळके
- गावचा विकास करायचाय, कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेऊ द्या, शिवसेना खासदाराचं राज्य सरकारला साकडं