मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्फोटक पत्र लिहिलं असून, शिवसेनेच्या नियमबाह्य कामांमुळे आणि दहशतीमुळे, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद पडतील. शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिकारी, तसेच कंत्राटदारांना भंडावून सोडले जात आहे. त्यांचे म्हणणे न ऐकले गेल्यास, कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
“शिवसैनिकांना आवरा नाहीतर…”, गडकरींचे मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र
नितीन गडकरींच्या या स्फोटक पत्राची आता मुख्यमंत्र्यांनी तात्कळ दखल घेतली असून, याप्रकरणी त्यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. त्यांनी कत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मागितली आहे. त्यामुळे, चिथावणी देऊन महामार्गांची काम बंद पाडणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
विरोधकांनी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी किरीट सोमय्याला चुकीची महिती दिली – आमदार सुनिल शेळके
यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी, गडकरींच्या पत्राचा संदर्भ देत राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. “वरील प्रकरणी आपल्याकडे कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्ज आणि त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले आहेत का? झाले असतील तर याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ उपलब्ध करुन द्यावा,” असंही पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रादेशात लिहिलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील राष्ट्रीय रस्ते विकासाची कामं रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर आज गडकरींनी या कामांची माहिती घेतल्यावर, स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी या कामात खोडा घातल्याचं त्यांच्या कानावर आलं. यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना, स्थानिक नेत्यांचे असेच प्रकार सुरु राहिले, तर राज्यात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल,” असा थेट इशारा दिला होता.
Read Also :
- राज्यपालांवर भाजपचा दबाव, त्यांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरून घेऊ नये!” राऊतांची खरमरीत टीका
- गावचा विकास करायचाय, कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेऊ द्या, शिवसेना खासदाराचं राज्य सरकारला साकडं
- “काम करणारे पुढे या, फोटोसाठी पुढे पुढे मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा ”, अजित पवारांच्या कानपिचक्या
- बंदी असताना गोपीचंद पडळकरांकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन; ठाकरे सरकार कारवाई करणार ?
- उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील – रोहित पवार