मुंबई : आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचं उदघाटन होत असून, वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने आज पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भुयारी मार्गासह मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या वतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात उभारण्यात आलेल्या मेट्रो २ अ, तसेच मेट्रो ७ च्या चाचणी मार्गांचे उदघाटन करण्यात आले.
दरम्यान, “या कार्यक्रमाला येताना मला शहारत अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी दिसली. ही मोठी चिंता करणाऱ्यासारखी गोष्ट आहे. राज्यातली महामारी अजूनही संपली नसताना देखील एवढी गर्दी आहे. मुंबईकरांनो मुक्त संचार केलात, तर याद ठेवा, निर्बंध अधिक कडक केले जातील!,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरवासीयांनी दिला आहे.
तसेच, ‘कालच्या जनसंवादात मी राज्यातला लॉकडाऊन उठवत आहे, असं तर चुकून बोललो नाही ना, अशी विचारणा मी ही गर्दी बघून अधिकाऱ्यांना केली, हे अयोग्य आहे,” असं देखील ते म्हणाले. ते मुंबईतल्या वांद्रे इथे एमएमआरडीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी येत होते. त्यावेळी त्यांना दिसलेल्या ट्राफिकवर त्यांनी बोट ठेवलं.
दरम्यान, एमएमआरडीएने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. मात्र, या उदघाटनाला राज्याच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण देण्यात न आल्याने भाजपने याविरोधात निदर्शेन केली असून, त्यांनी यावर बहिष्कार घातला आहे.
Read Also :
- मराठा समाजाला आघाडी सरकारकडून मोठा दिलासा, मराठा तरुणांना मिळणार EWS मध्ये 10 % आरक्षण
- मी मोदींवर नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला!
- गुजरातला हजार कोटींची मदत केलीत, महाराष्ट्राला तुम्हाला वाटत असतील तेवढे तरी द्या!
- ‘मी कोविडयोद्धा म्हणून बाहेर पडावसं वाटत असेल, तर माझ्या ५ मागण्या आधी पूर्ण करा’
- ‘आरक्षणप्रश्नी कोणासोबतही चर्चेला तयार, फक्त समोरच्यांनाही एकच सूचना…’