मुंबई : सहकार खातं महाविकास आघाडीला कब्जात घ्यायचं आहे असा आरोप आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सहकारी संस्था नाही तर सरकारी संस्था अशी परिस्थिती सरकार आणू पाहतं आहे जे चुकीचं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सहकार खात्याच्या बदलांवर फडणवीसांनी आक्षेप घेतले. त्यानंतर भाजपने सभात्यागही केला.
नितेश राणेंना “म्याव म्याव” प्रकरण चांगलंच भोवलं; भास्कर जाधवांकडून निलंबनाची मागणी
‘या ठिकाणी विधेयक क्रमांक 39 आलं आहे त्यामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे 22 वा खंडातल्या मुख्य अधिनियमाच्या कलम 157 मधील दुसरे परंतूक वगळण्यात येईल. या संपूर्ण विधेयकाचा खरा हेतू हे 22 वा खंड आहे. म्हणजे काय होईल? या अधिनियमाच्या तरतुदीपैकी कोणत्याही तरतुदीपासून किंवा त्याखाली केलेल्या नियमांपासून कोणत्याही संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गास सूट देण्यासाठी राज्य सरकारचे अधिकार पुनर्स्थापित कऱण्यासाठी ही सुधारणा केली जाते आहे. याचाच अर्थ असा की सहकारी संस्थांच्या संदर्भात सगळे अधिकार सरकारने स्वतःकडे घेण्याची ही तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; शरद पवारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन
‘हे कुठले अधिकार आहेत? तर लक्षात येतं की, राज्य शासनास सर्वसाधारण किंवा विशेष अधिकार आदेशाद्वारे कोणत्याही संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गास या अधिनियमाद्वारे कोणत्याही तरतुदीच्या नियमांपासून सूट देता येईल किंवा अशा आदेशात विनिर्निष्ट करता येतील. अशा नियमांच्या किंवा अधिनियमांच्या बदलांमध्ये बाधा येणार नाही अशी फेरफारनिशी संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गास लागू होतील असे निर्देश देता येतील. विशेषतः दुसरं परंतूक काय होतं? राज्य शासनाला या अधिनयमाची कलमं 26, 73 अ, 73 अअ, 73 ब, 73 क, 73 कअ, 73 कब, 73 ई, 75 अ, 76 अ, 77अ आणि 81 यापासून कोणत्याही संस्थेस किंवा संस्थेच्या वर्गाला सूट देता येणार नाही. हे मूळ कलम होतं. आता हे सगळे अधिकार सरकार आपल्याकडे घेत आहे. याचा उद्देश हा काही घटनादुरूस्तीमुळे घेतलेला नाही. याचा खरा उद्देश जर काही असेल तर सेक्शन 157 च्या माध्यमातून सगळे अधिकार आपल्याकडे ठेवणं हा आहे. हे सगळे अधिकार सरकारच्या इच्छेनुरूप झाला तर केवळ दुरूपयोग यातून होणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
Read also:
- ‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’; शिवसेनेच्या मोर्चात नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी
- “बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा टोला
- अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी टोचले आमदारांचे कान
- “कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा”; अजित पवारांनी खडसावलं
- नितेश राणे कुठेयं, हे मी का सांगू? मुलाच्या अटकेच्या भीतीने नारायण राणे घाबरले?