मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई येथील पक्ष कार्यालयात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपावासी झालेत. त्यानंतर राजकीय वर्तुळातून आता जोरदार प्रतिक्रिया येत आहे. तर विरोधक अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत टिका करतांना दिसत आहेत. यातच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! शरद पवार गटाचा चव्हाणांना टोला
अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे दहा ते बारा आमदार देखील पक्ष प्रवेश करणार आहे. या पक्ष प्रवेश सोहळा नांदेड येथे होणार असल्याची माहिती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यातच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसचं मोठं नुकसान होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर कॉंग्रेस तसा मोठा सागर आहे. एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी ? भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत, रंगत वाढली
एक जण गेला तर दुसरा येईल असंही ते म्हणाले. सोबतच राज्यसभेच्या जागेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. एका सदस्यावर राज्यसभा अवलंबून नसते. मोठा ग्रुप असता तर फरक फडला असता. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने जालन्यात थोडाफार फटका बसू शकतो. उर्वरित मराठवाड्यात कोणताही फरक पडणार नाही. असा दावा देखील त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपाची स्मरणशक्ती कमजोर, का ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ? नाना पटोलेंचा भाजपला सवाल
अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? फडणवीसांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…
हेही वाचा…मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच मिळणार, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा कॉंग्रेसला राम राम..,! काय आहे आदर्श घोटाळा ? वाचा सविस्तर