मुंबई : नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. ते नेहमीच हिंदु धर्माचा द्वेष करतात. तसेच पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती तर जातीवाद केला नसता. देवी देवतांचा अपमान केलाच नसता. तर एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा, असं म्हणत भाजपने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला. अशातच आता राष्ट्रवादी आणि भाजपच्या या ट्विटवारमध्ये काॅंग्रेसने उडी घेतली आहे.
“कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
देवी देवतांना दुषणे संतांनीही दिली. तुकाराम म्हणाले, माझ्या लेखी देवी मेला! जनाबाई म्हणाल्या, अरे विठ्या विठ्या! मुळ मायेच्या कारट्या ! उभी राहुनी अंगणी ! शिव्या देत दासी जनी ! भक्तीतून ईश्वरनिंदेचाही अधिकार मिळतो हे विठ्ठलाचे तेज काढण्याच्या विचारांच्या तुम्हा मनुवाद्यांना कळणार नाही आणि भाजप तुम्हाला हिंदुत्व शिकवणारे सावरकर नास्तिक होते बंर. तुमच्या समविचाऱ्यांकडून गांधीहत्या करण्याचे 7 वेळा प्रयत्न झाले ते अस्पृश्यता निवारण व मंदिर प्रवेश कार्यक्रम होती घेतल्यानंतर तुम्ही बाबासाहेबांना सोडले नाही. मग पाथरवट कवितेतील शोषिताच त्रागा काय कळणार ? असा खोचक सवाल काॅंग्रेस नेते सचिन सांवत यांनी केला आहे.
भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीला ठेचण्यासाठी संत ज्ञानोबा माउलींपासून संत तुकोबा, संत गाडगेबाबा, शाहू-फुले-आंबेडकरांपर्यंत सर्वच महामानवांनी सामाजिक चळवळ उभी केली. अण्णाभाऊ साठे , नामदेव ढसाळ, जवाहर राठोड यासारख्या साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून अस्पृश्यतावादी मानसिकतेवर आपल्या लेखणीतून घणाघात केला आणि समाजाला अन्यायाची जाण करून दिली. राजकीय आरोप करण्यासाठी भाजपने शरद पवारांनी दिलेल्या संदर्भाची मोडतोड करून नास्तिकता शोधली, परंतु त्याच संदर्भात अस्पृश्यतेवर केलेला घणाघात भाजपला दिसला नाही, हीच भाजपची खरी मानसिकता आहे. अशी टिका त्यांनी केली आहे.
संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
दरम्यान, सर्वच समाजसुधारकांच्या काळात देखील अशा मनुवृत्ती होत्या आणि त्या मनुवृत्तींनी नेहमीच या सर्व समाजसुधारकांचा विरोध केला. आज माऊली, तुकोबा, गाडगेबाबा हे महापुरुष असते तर त्यांना देखील नास्तिक म्हणून भाजपने हिणवले असते, कारण हाच भाजपचा खरा विचार आणि चेहरा आहे. असो, हा महाराष्ट्र आहे.. इथे तुमच्या मनुवृत्तीची डाळ कधीही शिजणार नाही, त्यामुळे आता तरी सुधरा. असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
Read also:
- ‘सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐका’; महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
- “संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
- राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
- ‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
- “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल