मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून मराठा समाजामधून राज्य सरकार विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. या मुद्द्यावरुन एकीकडॆ शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी १ ते ५ जून दरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच, अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आणि EWS आरक्षण मराठा समाजाला लागू होण्यासाठी आज त्यांनी राज्य सरकार आणि अशोक चव्हाणांना न्यायालयात खेचले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडल्यानंतर, अशोक चव्हाण यांनी यावरून मेटेंना जोरदार टोला लगावला आहे. ‘मराठा आकलन कालावधी दरम्यान ज्या तरुण-तरुणींची निवड झाली आणि ज्यांच्या नियुक्त्या रखडल्या, आज या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटे आणि संभाजी राजे या दोघांच्याही भूमिकेत मोठा फरक आहे. संभाजी राजे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत, तर विनायक मेटेंची भूमिक राजकीय वाटत आहे,’ असं त्यांनी सांगितलं.
तसेच, ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडमध्ये १ ते ५ जून दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे. यावर चव्हाणांनी म्हटलं, ‘मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मेटेंनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा त्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडावी,’ असा सल्ला त्यांनी मेटेंना दिला आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती देतांबा त्यांनी सांगितले, ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले, त्यानंतर मराठा समाज हा खुल्या वर्गात गणला जातो. त्यानुसार खुल्या वर्गासाठी केंद्र सरकारने EWS आरक्षण लागू केले.
मात्र, आघाडी सरकारने १५ दिवस उलटूनही मराठा समाजाला EWS आरक्षण लागू केले नाहीये. यामुळे मराठा समाजाच्या लाखो मुला-मुलींचे नुकसान होत असून, याला अशोक चव्हाण आणि ठाकरे सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आणि EWS आरक्षण मराठा समाजाला लागू होण्यासाठी मी औरंगाबाद खंडपीठामध्ये आज याचिका दाखल केली आहे, मला खात्री आहे सरकारने कितीही जरी अन्याय करायचा ठरवला तरी औरंगाबाद खंडपीठ न्याय दिल्याशिवाय राहणार नाही,”
Read Also :
- ‘मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, नाहीतर परिणाम गंभीर होतील’; ओबीसी महासंघाचा इशारा
- कोकणवासीयांना मदत मिळणार, कुणालाही वंचित ठेवणार नाही – मुख्यमंत्री
- मराठा आरक्षण : विनायक मेटेंनी ठाकरे सरकारला खेचले न्यायालयात
- ‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहणाऱ्या संभाजीराजेंसाठी वेळ नाही, पण अभिनेत्रींना भेटायला वेळ आहे’
- ‘लॉकडाऊन ४ टप्प्यात उठवणार, मात्र निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका’