मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा ही दुर्दैवी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपविरूद्ध लढायचं असेल तर काँग्रेसला पुर्णवेळ अध्यक्ष हवा आहे. केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये, अशा शब्दात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
“काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या पायऱ्यांवर जोर जोरात बोंबलतात”
गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा ही दुर्दैवी घटना आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी पक्षातील नेत्यांची मागणी होती. यातून पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रश्नच नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपविरूद्ध लढायचं असेल तर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा आहे, अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसवर केली आहे.
“राष्ट्रवादीची ‘बी’ टीम ब्रिगेड बरोबर राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम नवाब सेनेची युती”; मनसेचा शिवसेनेला टोला
काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी लोकशाही पद्धतीन निवडणूक घेण्यात यावी. मागील 24 वर्षात काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुकाच झालेल्या नाहीत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्ष व्हावे, अशी आमची मागणी आहे. मात्र केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.
“नितेश राणे रात्री पत्र लिहतात काय?”; किशोरी पेडणेकरांचा राणेंना टोला
ज्या व्यक्तीला काँग्रेस नेतृत्वाने सर्वाधिक सन्मान दिला. त्याच व्यक्तीने काँग्रेसच्या नेतृत्वावर व्यक्तिगत हल्ला करून आपले खरे चरित्र उघड केले आहे. आधी संसदेत मोदींचे अश्रू, नंतर पद्म विभूषण, मग दिल्लीतील बंगल्याला मुदतवाढ..हा योगायोग नाही तर सहयोग आहे, अशी तिरकस प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.
Read also
- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर
- पुन्हा मोदीच! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अव्वलस्थानी
- शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार?; भाजपकडून हलचाली सुरू
- “सत्तेविना मती गेली, जो मिळाला त्याच्याशी युती केली”; मनसेचा उद्धव ठाकरेेंना टोला
- “उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला